दहा हजार नागरिक झाले स्थलांतरित

By Admin | Published: February 17, 2016 03:07 AM2016-02-17T03:07:23+5:302016-02-17T03:07:23+5:30

मराठवाड्याला फेबु्रवारीच्या मध्यान्हातच दुष्काळाचे तीव्र चटके बसू लागले आहेत. पाणीसाठे आटल्याने आणि शेतीपूरक कामे नसल्यामुळे विभागातून सुमारे १० हजार नागरिकांनी स्थलांतर केल्याचा अंदाज आहे.

Migrants become ten thousand citizens | दहा हजार नागरिक झाले स्थलांतरित

दहा हजार नागरिक झाले स्थलांतरित

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्याला फेबु्रवारीच्या मध्यान्हातच दुष्काळाचे तीव्र चटके बसू लागले आहेत. पाणीसाठे आटल्याने आणि शेतीपूरक कामे नसल्यामुळे विभागातून सुमारे १० हजार नागरिकांनी स्थलांतर केल्याचा अंदाज आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (ईजीएस) कामांत दुपटीने वाढ झालेली असताना योजनेवरील सुमारे १० हजार मजूर कमी झाले आहेत. हे मजूर काम सोडून जाणे म्हणजे स्थलांतरित होणे असा अर्थ लावला जाऊ शकतो, असे मत विभागीय आयुक्तालयातील सूत्रांनी व्यक्त केले.
रोहयोच्या कामावरील मजूर कमी होण्याचे प्रमाण मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत आढळत आहे. ११ हजार ३५६ कामे सुरूआहेत. मागच्या आठवड्यात ६ हजार ६४६ कामे सुरू होती. विभागातील धरणांमध्ये फक्त ७ टक्के पाणीसाठा आहे. लातूरला महिन्यातून एकदा पाणीपुरवठा होतो. मागील ४५ दिवसांत १२४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. रोहच्या कामावर १६५ रुपयांच्या आसपास रोज मिळत असला तरी त्यातून भागेल, अशी शक्यता नसल्यामुळे मजूरसंख्या घटू लागली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Migrants become ten thousand citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.