Rupali Patil : "चित्राताई संजय राठोडांना राखी बांधायला जाणार; तुमचा लढा खोटा, तुम्ही कधीच जिंकू शकत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 05:03 PM2022-08-09T17:03:22+5:302022-08-09T17:12:39+5:30

NCP Rupali Patil Slams BJP And Chitra Wagh : रुपाली पाटील यांनी "बेकायदेशीर सरकारने आज अखेर मंत्रिमंडळाची शपथ घेतली आहे. रखडलेला पाळणा आज हलला" असे म्हणत राज्य सरकारवर टीका केली आहे.

NCP Rupali Patil Slams BJP And Chitra Wagh Over Sanjay Rathod | Rupali Patil : "चित्राताई संजय राठोडांना राखी बांधायला जाणार; तुमचा लढा खोटा, तुम्ही कधीच जिंकू शकत नाही"

Rupali Patil : "चित्राताई संजय राठोडांना राखी बांधायला जाणार; तुमचा लढा खोटा, तुम्ही कधीच जिंकू शकत नाही"

googlenewsNext

मुंबई - शिवसेना नेते आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे ते आता फडणवीस आणि चंदकांत पाटील यांच्यासोबत मंत्रीमंडळात दिसणार आहे. ज्या भाजपने त्यांच्या राजीनाम्यासाठी राळ उठवली होती, आंदोलने केली होती तेच आता भाजपसोबत मंत्री असणार आहेत. त्यामुळे, भाजपाची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील (NCP Rupali Patil) यांनी भाजपा आणि भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्यांना भाजपात घेऊन गंगेत धुतलं, पवित्र केलं" असं म्हणत संताप व्यक्त केला आहे. 

रुपाली पाटील यांनी "बेकायदेशीर सरकारने आज अखेर मंत्रिमंडळाची शपथ घेतली आहे. रखडलेला पाळणा आज हलला" असे म्हणत राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच चित्राताई आता संजय राठोड यांना राखी बांधायला बंगल्यावर जाणार आहेत असं म्हणत हल्लाबोल केला आहे. "भाजपा केवळ महिला सन्मानाचा दिखावा करते. मात्र यानिमित्ताने भाजपा आणि शिंदे-फडणवीसांचा चेहरा महाराष्ट्राच्या समोर आला आहे. आज शपथविधी झालेल्या निम्म्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप याच भाजपाने केले होते. पण त्यांना भाजपामध्ये घेऊन गंगेमध्ये धुतले आणि पवित्र केले. भाजपा सत्ता मिळवण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊ स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेत आहे, हेच दिसून येते" असं रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे. 

"भाजपाच्या चित्रा वाघ, देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या अक्षरश: ओरडून ओरडून सांगत होते, की संजय राठोड यांनी बलात्कार केला आहे. आता त्याच संजय राठोड यांना भाजपाने पवित्र करून घेतले आहे. चित्राताई आता संजय राठोड यांना राखी बांधायला बंगल्यावर जाणार आहेत. चित्रा वाघ म्हणत आहेत, की लढेंगे और जितेंगे… चित्राताई तुमचा लढा ही खोटा आणि तुम्ही आयुष्यात कधीच जिंकू शकत नाही" असं म्हणत रुपाली पाटील यांनी बोचरी टीका केली आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

"एका संजयने मविआ सरकार बुडवले आता मंत्रिमंडळातील हा संजय या सरकारचं जहाज बुडवेल"

संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद दिल्याने यावरून अनेकांनी नव्या सरकारवर निशाणा साधला आहे. राठोड यांच्यावरून मनसेने ही खोचक टोला लगावला आहे. मनसेचे  प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "एक संजयने महाविकास आघाडी सरकार बुडवले आता मंत्रिमंडळातील हा संजय या सरकारचे जहाज बुडवेल असं दिसतंय... सब घोडे बारा टक्के..." असं गजानन काळे यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील हल्लाबोल केला आहे. 
 

Web Title: NCP Rupali Patil Slams BJP And Chitra Wagh Over Sanjay Rathod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.