Maharashtra Cabinet Expansion: “संजय राठोडांना मंत्री केल्याचा मनापासून आनंद, पण...”; सुप्रिया सुळेंची शिंदे-भाजप सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 01:40 PM2022-08-09T13:40:12+5:302022-08-09T13:41:30+5:30

Maharashtra Cabinet Expansion: भाजपने कोणतेही भान न ठेवता संजय राठोडांवर आरोपांची राळ उठवली होती. आता काय झाले, अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

ncp supriya sule criticised eknath shinde and bjp govt over sanjay rathod oath in cabinet expansion | Maharashtra Cabinet Expansion: “संजय राठोडांना मंत्री केल्याचा मनापासून आनंद, पण...”; सुप्रिया सुळेंची शिंदे-भाजप सरकारवर टीका

Maharashtra Cabinet Expansion: “संजय राठोडांना मंत्री केल्याचा मनापासून आनंद, पण...”; सुप्रिया सुळेंची शिंदे-भाजप सरकारवर टीका

Next

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन ३८ दिवस झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाच्या मुहुर्ताला मूर्त रुप आले. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. मात्र, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मागील मंत्रिमंडळातून राजीनामा द्याव्या लागलेल्या संजय राठोड यांना नव्या सरकारने पुन्हा एकदा मंत्री केले आहे. यावरून शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

शिंदे-फडणवीस सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ शपथविधीमध्ये एकाही महिला आमदाराला स्थान मिळालेलं नाही. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचं सांगतात. त्यासाठी त्या केवळ 'होम मेकर' असू नयेत तर त्या 'नेशन बिल्डर' असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्व देण्यात आलेले नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

संजय राठोडांना मंत्री केल्याचा आनंद, पण...

संजय राठोड महाविकास आघाडीत मंत्री असताना आम्ही सातत्याने सांगत होतो की, त्यांच्यावर अन्याय होतोय. मात्र, भाजपने कोणतेही भान न ठेवता राळ उठवली होती. बेछूट आरोप केले होते. मात्र, त्या आरोपांचे नंतर काय झाले, असा सवाल उपस्थित करत आता संजय राठोड यांना मंत्रिपद मिळाल्याचा मला मनापासून आनंद होत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. मात्र, पूजा चव्हाण महाराष्ट्राची मुलगी आहे, तिच्या बाबतीत नक्की काय झालेय, असे सांगत भाजपने त्या काळात संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी खूपच दबाव टाकला होता. स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी भाजप कुठल्या थराला जाईल, हे सर्वांनीच पाहिले, अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळेंनी केली. 

दरम्यान, पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिले जाणे हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूच ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास. लडेंगे….जितेंगे, असे चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 
 

Web Title: ncp supriya sule criticised eknath shinde and bjp govt over sanjay rathod oath in cabinet expansion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.