Supriya Sule : "50 खोक्यांमुळे यांचा आराम, मराठी माणूस भरडला जातोय, हे स्वार्थी ईडी सरकार"; सुप्रिया सुळेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 03:01 PM2022-09-18T15:01:50+5:302022-09-18T15:15:43+5:30

NCP Supriya Sule Slams CM Eknath Shinde : सुप्रिया सुळे य़ांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे

NCP Supriya Sule Slams CM Eknath Shinde And Devendra Fadnavis Over ED | Supriya Sule : "50 खोक्यांमुळे यांचा आराम, मराठी माणूस भरडला जातोय, हे स्वार्थी ईडी सरकार"; सुप्रिया सुळेंची टीका

Supriya Sule : "50 खोक्यांमुळे यांचा आराम, मराठी माणूस भरडला जातोय, हे स्वार्थी ईडी सरकार"; सुप्रिया सुळेंची टीका

Next

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP Supriya Sule) य़ांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. "माय-बाप जनतेला वाऱ्यावर सोडणं कितपत योग्य याचं आत्मचिंतन ओरबाडून आलेल्या खोके सरकारने करावं" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच "50 खोक्यांमुळे यांचा आराम चालला आहे. पण यामध्ये सर्वसामान्य मराठी माणूस भरडला जातोय, हे स्वार्थी ईडी सरकार" असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर बोचरी टीका केली आहे. 

"स्वत:च्या स्वार्थासाठी सरकार चालवणं आणि सर्वसामान्य माय-बाप जनतेला वाऱ्यावर सोडणं हे कितपत योग्य आहे याचं आत्मचिंतन आता ओरबाडून आलेल्या खोके सरकारने करावं. माझी ईडी सरकारला विनंती आहे की तुम्ही तातडीने इलेक्शन घ्या, लोकप्रतिनिधीची महाराष्ट्राला गरज आहे. 50 खोके असल्याने याचा आराम चालला आहे पण सामान्य मराठी माणूस यामध्ये भरडला जातो. सत्तेसाठी किती तडजोड करावी याचे उत्तम उदाहरण सध्याचे सरकार आहे" असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 

"लोकांचं नुकसान झालं तरी चालेल, स्वत:चं नुकसान होऊ नये असं स्वार्थी ईडी सरकार"

"सत्ता टिकली पाहिजे, हे त्यांचे धोरण आहे. सत्ता टिकावी यासाठी तडजोड करणे सुरू आहे. लोकांचं नुकसान झालं तरी चालेल पण स्वत:चं नुकसान होऊ नये असं हे स्वार्थी ईडी सरकार आहे. राष्ट्रवादी पक्ष हा संविधान मानणारा आहे. तर भाजपाचे अध्यक्ष म्हणतात की, एक देश एक पक्ष आहे. ही एक हुकूमशाहीच म्हणावी लागेल. ही देशातील दडपशाही आहे" असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी याआधी देखील राज्यातील नव्या सरकारवर हल्लाबोल केला आहे.

 "राज्याला 2 मुख्यमंत्र्यांची गरज; एक कार्यक्रमाला जातील, दुसरे..."

"आता गणपती आहेत. त्यानंतर अनेक सण आणि काहीनाकाही होत राहील. त्यामुळे महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक या कार्यक्रमाला जातील आणि दुसरे मंत्रालयात बसून माय-बाप जनतेची सेवा करतील असा निरोप आम्हाला कोणीतरी Whatsapp वर पाठवला आहे" असं म्हटलं होतं. तसेच सुप्रिया सुळे यांनी "महाराष्ट्रातलं सरकार ओरबाडून, दडपशाही करून, ईडी करून चुकीच्या पद्धतीने सत्तेत आलं आहे. आजकाल ५० खोके, एकदम ओके हे ऐकायला मिळत... हे खूप दुर्दैवी आहे. अडीच महिने झाले आपल्या जिल्हात आणि कुठेही राज्यात पालकमंत्रीच नाही. मी गेले 15 दिवस नव्या मंत्र्यांची कामासाठी वेळ मागतेय पण मला अजूनही वेळ मिळालेली नाही" असंही म्हटलं होतं. 

Web Title: NCP Supriya Sule Slams CM Eknath Shinde And Devendra Fadnavis Over ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.