एक दिवसाची मुदतवाढ; ३१ऑक्टोबरला होणार विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची पडताळणी

By सचिन लुंगसे | Published: October 30, 2022 10:17 PM2022-10-30T22:17:53+5:302022-10-30T22:19:03+5:30

महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता ३ वर्षांच्या निश्चित कालावधीकरिता कंत्राटी पध्दतीने उमेदवारांची निवड करण्यासाठी एप्रिल व जुलै २०१९ मध्ये विद्युत सहाय्यक या पदांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.

One day extension Document Verification of Electrical Assistants will be held on 31st October 2022 | एक दिवसाची मुदतवाढ; ३१ऑक्टोबरला होणार विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची पडताळणी

एक दिवसाची मुदतवाढ; ३१ऑक्टोबरला होणार विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची पडताळणी

Next

मुंबई : उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्णयानुसार प्रसिध्द केलेल्या सुधारित निवड यादीमध्ये नव्याने निवड झालेल्या विद्युत सहाय्यक या संवर्गातील उमेदवारांची तसेच प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांच्या प्रमाणपत्रांच्या पडताळणीस एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता परिमंडळनिहाय ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.

महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता ३ वर्षांच्या निश्चित कालावधीकरिता कंत्राटी पध्दतीने उमेदवारांची निवड करण्यासाठी एप्रिल व जुलै २०१९ मध्ये विद्युत सहाय्यक या पदांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.

परिमंडलनिहाय यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या परिमंडल कार्यालयांमध्ये दि. २९ व ३० ऑक्टोबर २०२२ रोजी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झालेली आहे. परंतु ज्या उमेदवारांना या दिवशी  उपस्थित राहणे शक्य झाले नाही.त्यांना  आणखी एक संधी महावितरणकडून देण्यात आली आहे.

 उमेदवारांची परिमंडलनिहाय यादी महावितरणच्या संकेतस्थळावर (www.mahadiscom.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीकरिता याउपरही हजर राहणार नाहीत, अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल.
 

Web Title: One day extension Document Verification of Electrical Assistants will be held on 31st October 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.