भांडणाला कंटाळून आई-वडिलांची हत्या

By admin | Published: March 8, 2016 03:07 AM2016-03-08T03:07:17+5:302016-03-08T03:07:17+5:30

दररोज होणाऱ्या भांडणाने वैतागलेल्या मुलाने सोमवारी पहाटे सूर्यादय चौकात आपल्या वडिलांची चाकूने गळा कापून आणि सावत्र आईची डोक्यात वरवंटा घालून हत्या केल्याची घटना वासिंद येथे घडली.

Parents killed in a gunfight | भांडणाला कंटाळून आई-वडिलांची हत्या

भांडणाला कंटाळून आई-वडिलांची हत्या

Next

वासिंदमधील घटना;तरुणाला अटक
वासिंद/शहापूर : दररोज होणाऱ्या भांडणाने वैतागलेल्या मुलाने सोमवारी पहाटे सूर्यादय चौकात आपल्या वडिलांची चाकूने गळा कापून आणि सावत्र आईची डोक्यात वरवंटा घालून हत्या केल्याची घटना वासिंद येथे घडली. या प्रकरणी आरोपी सागर सुरेश दिनकर यास पोलिसांनी अटक केली आहे.
सुरेश वामन दिनकर व लता सुरेश दिनकर अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. सुरेश यांना पहिल्या पत्नीपासून सागर आणि अजय ही दोन मुले असून, पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर सुरेश यांनी लता यांच्याबरोबर दुसरा विवाह केला. तिच्यापासून एक मुलगी झाली आहे. हे सर्व वासिंद येथे एकत्र राहतात. वडील आणि सावत्र आई यांच्याबरोबर मुलांचे काही ना काही कारणांवरून रोज खटके उडत होते. या भांडणाने आणि शिवीगाळीमुळे घरातील वातावरण नेहमी तप्त असायचे. तालुक्यातील बिरवाडी येथे कबड्डी स्पर्धेतून सोमवारी पहाटे परतल्यानंतर मोठा भाऊ सागर घरी गेला; तर अजय मित्रांशी गप्पा मारत बसला. सागरचे आईवडिलांशी भांडण झाले. रागाच्या भरात त्याने आईच्या डोक्यात वरवंटा घातला. त्यानंतर चाकूने वडिलांचा गळा चिरला. साधारण अर्ध्या तासाने लहान भाऊ अजय घरी आला असता त्याने आपले आईवडील दोघे रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे पाहिले. यामुळे बाहेर येऊन त्याने सुरेशला काय प्रकार झाला, असे विचारले असता त्याने मी दोघांना मारून टाकले, असे सांगितले. त्यानंतर वासिंद पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली.

Web Title: Parents killed in a gunfight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.