‘अच्छे दिन’साठी मोदी सरकारविरोधात याचिका
By Admin | Published: June 27, 2014 12:54 AM2014-06-27T00:54:22+5:302014-06-27T00:54:22+5:30
मोदी सरकारविरोधात विश्वासघाताची कारवाई करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आह़े
>मुंबई : ‘अच्छे दिन आयेंगे’ची स्वप्ने दाखवत मोदी सरकारने देशाची सत्ता हातात घेतली़ मात्र सत्तेत येऊन एक महिना उलटून गेला असून, यातील एकही स्वप्न पूर्ण झालेले नाही़ ही नागरिकांची दिशाभूल असून, या प्रकरणी मोदी सरकारविरोधात विश्वासघाताची कारवाई करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आह़े
एका वकिलाने ही जनहित याचिका केली आह़े 16व्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना भाजपने अच्छे दिन आयेंगे, अशी अनेक स्वप्ने जनतेला दाखवली व भाजपला मतदान करण्याचे आवाहन केल़े या आवाहनाला जनतेने प्रतिसाद दिला व मोदी सरकार सत्तेत आल़े याला आता जवळपास एक महिना उलटून गेला़ मात्र एकही आश्वासन मोदी सरकारने अजून पूर्ण केलेले नाही़
हे गैर असून ही सर्वसामान्यांची दिशाभूल आह़े तेव्हा मोदी सरकारवर विश्वासघाताची कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आह़े या याचिकेवर
पुढील आठवडय़ात सुनावणी होणार आह़े (प्रतिनिधी)
च्लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी नरेंद्र मोदी यांनी मतदारांना चांगले दिवस येतील, अशी आश्वासने दिली होती. त्यावर याचिकेत आक्षेप घेतला आहे.