शेतकऱ्यांचा संप : साताऱ्यात दुधाची गाडी फोडली

By Admin | Published: June 1, 2017 01:04 AM2017-06-01T01:04:29+5:302017-06-01T02:16:25+5:30

आज मध्यरात्रीपासून शेतकऱ्यांच्या संपाला सुरुवात झाली असून, शहरांकडे जाणारा भाजीपाला आणि दुधपुरवठा रोखण्यासाठी आंदोलकांनी कंबर

The property of the farmers broke the milk car in Satara | शेतकऱ्यांचा संप : साताऱ्यात दुधाची गाडी फोडली

शेतकऱ्यांचा संप : साताऱ्यात दुधाची गाडी फोडली

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 1 -  आज मध्यरात्रीपासून शेतकऱ्यांच्या संपाला सुरुवात झाली असून, शहरांकडे जाणारा भाजीपाला आणि दुधपुरवठा रोखण्यासाठी आंदोलकांनी कंबर कसली आहे. या संपादरम्यान साताऱ्यात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरहून मुंबईकडे येणाऱ्या दुधाच्या गाड्या रोखल्या असून, दूधवाहतूक करणाऱ्या ट्रकची तोडफोड केली आहे. आज मध्यरात्री पुणे-बंगळुरू महामार्गावर ही तोडफोड करण्यात आली आहे.   
दरम्यान, शहराकडे येणारा भाजीपाला आणि दुधपुरवठा रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. ठिकठिकाणी रात्री 10 पासूनच शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. नगर-कल्याण हायवेवर टाकळी ढोकेश्वर,ता.पारनेर जि.अहमदनगर येथे शेतकऱ्यांनी चेकपोस्ट उभारले आहेत. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करून शेतमालाची वाहने रोखून धरली जात आहेत. 

नगर जिल्ह्यातील ३५०० दूध संकलन केंद्रे, ५०० शीतकरण केंद्रे व प्रकल्प संपादरम्यान बंद राहणार आहेत. संपकाळात मुंबईला जाणारे १०लाख लिटर दूध रोखण्यात येईल. तसेच सर्व बाजार समित्या बंद राहणार. संप यशस्वी करण्यासाठी राज्यात गनिमी कावा पथके कार्यरत झाली आहेत. दरम्यान  माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. तर खासदार उदयनराजे भोसले यांनी वाहतूकदारांना इशारा दिला आहे. मुंबईला जाणारे गोकुळचे १२लाख दूध अडवणार असल्याचे ते म्हणाले.
 
शेतकऱ्यांची कर्जमाफी व विविध मागण्यांसाठी १ जूनपासून शेतकऱ्यांचा संप पुकारण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी  कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी भेट देऊन आंदोलनाच्या नेत्यांना चर्चेसाठी मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार सायंकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसमवेत शिष्टमंडळाची बैठक झाली. सातबारा कोरा करण्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्र्यांनी द्यावे, हा मुद्दा शिष्टमंडळाने बैठकीत प्रारंभीच मांडला. या मुद्यावर निर्णय झाल्याशिवाय पुढे चर्चाच होणार नाही, अशी शिष्टमंडळाची अट होती. परंतु सरसकट कर्जमाफी शक्य नसून, थकबाकीदार शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देऊ, या आपल्या पूर्वीच्या घोषणेवर मुख्यमंत्री ठाम राहिले. 
 
शेतकऱ्यांसाठी सरकार विविध योजना राबवत आहे, असेही त्यांनी सांगितले. या उत्तरावर शिष्टमंडळाचे समाधान न झाल्याने शिष्टमंडळ बैठकीतून बाहेर पडले. वेतन आयोग व उद्योगांसाठी पैसे आहेत. मग, शेतकरी कर्जमाफीसाठी का नाही? असा प्रश्न उपस्थित करत शिष्टमंडळाने संपाचा निर्णय कायम ठेवला.
 
१ जूनपासून दूध, भाजीपाला बंद 

सरकारसोबतची चर्चा फिस्कटल्याने शेतकरी नेत्यांनी गुरुवारपासून महामार्गावर चौक्या उभारून दूध व भाजीपाल्याची वाहने अडविण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी दूध व भाजीपाला बाजारात आणू नये, अशी वाहने आढळल्यास ती अडवली जातील, असे समन्वय समितीने जाहीर केले आहे.
 

Web Title: The property of the farmers broke the milk car in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.