महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमध्ये समाधानकारक बरसला पाऊस; सर्वांत कमी कृपा कोणत्या जिल्ह्यावर? अशी आहे आकडेवारी  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 09:50 AM2024-09-10T09:50:01+5:302024-09-10T09:50:26+5:30

छत्रपती संभाजीनगर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये ७९ टक्के आणि ७२ टक्के इतका जास्त पाऊस झाला आहे.

Satisfactory rainfall in 25 districts of Maharashtra Which district has the least rainfall | महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमध्ये समाधानकारक बरसला पाऊस; सर्वांत कमी कृपा कोणत्या जिल्ह्यावर? अशी आहे आकडेवारी  

महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमध्ये समाधानकारक बरसला पाऊस; सर्वांत कमी कृपा कोणत्या जिल्ह्यावर? अशी आहे आकडेवारी  

Maharashtra Rain Update ( Marathi News ) : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नोंदीनुसार, दि. १ जून ते ४ सप्टेंबर २०२४ दरम्यान महाराष्ट्रातील ३६ पैकी २५ जिल्ह्यांमध्ये दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या कालावधीत महाराष्ट्रात एकूण १०२५.४ मिमी पाऊस झाला आहे. हिंगोली या एकमेव जिल्ह्यामध्ये सरासरीच्या तुलनेत ३१% कमी पाऊस झाला आहे. २५ जिल्ह्यांपैकी छत्रपती संभाजीनगर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये ७९ टक्के आणि ७२ टक्के इतका जास्त पाऊस झाला असून, हे दोन जिल्हे सामान्य सरासरी पर्जन्यमानापेक्षा सर्वात जास्त विचलन असलेले जिल्हे आहेत.

इतर २३ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २० टक्के ते ५९ टक्के जास्त पाऊस झाला आहे. यामध्ये ५९ टक्के जास्त अतिवृष्टीसह लातूर जिल्ह्याचा समावेश आहे, ५५ टक्के जास्त अतिवृष्टीसह पुणे जिल्ह्याचा समावेश आहे, ५० टक्के जास्त अतिवृष्टीसह जळगाव, ४८ टक्के जास्त अतिवृष्टीसह नाशिक आणि बीड, ४७ टक्के जास्त अतिवृष्टीसह धुळे, ४६ टक्के जास्त अतिवृष्टीसह कोल्हापूर, ४५ टक्के जास्त अतिवृष्टीसह परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे.

दरम्यान, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत सामान्य पाऊस झाला आहे.
 

Web Title: Satisfactory rainfall in 25 districts of Maharashtra Which district has the least rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.