Shahajibapu Patil : "ज्यांची प्रवृतीच राजकारणात खोक्यावर अवलंबून त्यांना खोके दिसताहेत"; शहाजीबापू पाटलांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 02:41 PM2022-08-28T14:41:39+5:302022-08-28T14:56:54+5:30

Shahajibapu Patil And Shivsena : बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी 50 खोक्यांवरून टीका करणाऱ्यांवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे.

Shahajibapu Patil Slams Shivsena Uddhav Thackeray | Shahajibapu Patil : "ज्यांची प्रवृतीच राजकारणात खोक्यावर अवलंबून त्यांना खोके दिसताहेत"; शहाजीबापू पाटलांचं प्रत्युत्तर

Shahajibapu Patil : "ज्यांची प्रवृतीच राजकारणात खोक्यावर अवलंबून त्यांना खोके दिसताहेत"; शहाजीबापू पाटलांचं प्रत्युत्तर

googlenewsNext

राज्यातील सत्तासंघर्ष पराकोटीला जात महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. यानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना पाहायला मिळत आहेत. शिवसेनेचे काही आमदार आणि काही अपक्ष आमदार यांच्या साथीने शिंदे गटाने भाजपासोबत महाराष्ट्रात सत्तास्थापना केली. या सर्व आमदारांना भाजपाकडून प्रत्येकी ५० कोटी रूपये देण्यात आले असा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी 50 खोक्यांवरून टीका करणाऱ्यांवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे.

"ज्यांची प्रवृतीच राजकारणात खोक्यावर अवलंबून त्यांना खोके दिसताहेत, तुमचं नेमकं किती अस्तित्व शिल्लक राहीलं याचं आत्मचिंतन तुम्ही करा" असं म्हणत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच "तीन पक्षांचं सरकार बनताना आम्हाला हॉटेलमध्ये कोंडलं होतं. तुमचं तिकडे खोक्याचं काय झालं असं आम्ही म्हटलं तर आता का वाईट वाटतं. सत्ता गेली ती माणसं पातळी सोडून राजकारण करायला लागली" असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

"महाराष्ट्रच्या राजकारणात झालेली ही १०० टक्के वैचारिक क्रांती"

"कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आमचं काय होणार याची चिंता सामना पेपरने करू नये. तुमचं नेमकं किती अस्तित्व शिल्लक राहीलं याचं आत्मचिंतन तुम्ही करावं. महाराष्ट्रच्या राजकारणात झालेली ही १०० टक्के वैचारिक क्रांती आहे. जनतेच्या कल्याणासाठी हे सरकार आहे. शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार चांगलं काम करतं आहे. दोन्ही नेते चांगले अनुभवी आहेत. जनतेचे प्रश्न सुटतील असा विश्वास आहे" असं पाटील यांनी म्हटलं आहे. 

"तीन पक्षांचं सरकार बनताना आम्हाला हॉटेलमध्ये कोंडलं होतं"

"ज्यांची प्रवृतीच राजकारणात खोक्यावर अवलंबून आहे त्यांना खोके दिसत आहेत. त्यांचं आयुष्यच खोक्यावरच गेलं. सगळे खोक्याचेच गडी. त्यामुळे त्यांना आता यांना किती खोके मिळाले हे वाटतंय. तीन पक्षांचं सरकार बनताना आम्हाला हॉटेलमध्ये कोंडलं होतं. तुमचं तिकडे खोक्याचं काय झालं असं आम्ही म्हटलं तर आता का वाईट वाटतं. सत्ता गेली ती माणसं पातळी सोडून राजकारण करायला लागली" असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 
 

Web Title: Shahajibapu Patil Slams Shivsena Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.