युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2017 02:51 AM2017-06-10T02:51:00+5:302017-06-10T02:51:00+5:30

तालुक्यातील खामसवाडी येथील संदीप बळीराम शेळके (२२) या शेतकऱ्याने गुरूवारी मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केली.

Tension after suicide of young farmer | युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर तणाव

युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर तणाव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब (जि. उस्मानाबाद) : तालुक्यातील खामसवाडी येथील संदीप बळीराम शेळके (२२) या शेतकऱ्याने गुरूवारी मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केली. शासकीय अधिकारी वेळेवर घटनास्थळी न आल्याने संतप्त झालेल्या शेतकरी-ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शुक्रवारी सकाळी शेतात गेलेल्या शेजाऱ्यांना लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत संदीप दिसला. शवविच्छेदन झाल्यानंतर प्रशासनाच्या निषेधार्थ मृतदेह ताब्यात घेण्यास ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी विरोध केला़ पोलीस उपनिरीक्षक सुभाष माने यांनी ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. सायंकाळी अंत्यसंस्कार झाले़

Web Title: Tension after suicide of young farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.