'तुम्ही फक्त गुंड आवरा गुंड...'; एकनाथ शिंदेंच्या टीकेला अंबादास दानवे यांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 09:47 AM2024-02-08T09:47:06+5:302024-02-08T09:47:21+5:30

एकनाथ शिंदेंच्या या विधानावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Thackeray group leader Abandas Danve has criticized Chief Minister Eknath Shinde | 'तुम्ही फक्त गुंड आवरा गुंड...'; एकनाथ शिंदेंच्या टीकेला अंबादास दानवे यांचं प्रत्युत्तर

'तुम्ही फक्त गुंड आवरा गुंड...'; एकनाथ शिंदेंच्या टीकेला अंबादास दानवे यांचं प्रत्युत्तर

कोकण दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर येथेच टीका करून मोदी गॅरंटीद्वारे तयार झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये बसून मुंबईला आले हेच पंतप्रधान मोदींचे यश आहे, अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंवर केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येतील राम मंदिर आणि काश्मीरमधील ३७० कलम हटविण्याचे काम केले. देशात २५ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेबाहेर काढले तर ८० टक्के लोकांना पुढील ५ वर्षे मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर मोदींना पर्याय नाही. त्यामुळे यावेळी अब की बार ४५ पारचा नारा यशस्वी करून दाखवावा, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

एकनाथ शिंदेंच्या या विधानावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सोडून बोला मुख्यमंत्री महोदय...माझ्यासाहित तुम्हाला देखील पोलिओ डोस काँग्रेस सरकारच्या कालखंडात दिले गेले. मग तो डोस काँग्रेसने किंवा तेव्हाच्या पंतप्रधानांनी दिलेला होता का?, असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. तसेच वंदे भारत, राम मंदिर या दोन गोष्टी देशातील जनतेच्या घामा कष्टाच्या पै-पै जमवून झालेल्या आहेत. महाशक्तीच्या खिशातील पैशाने नाही, हे लक्षात ठेवा, असं अंबादान दानवे म्हणाले. तुम्ही फक्त गुंड आवरा गुंड, सध्या एवढे केले तरी खूप आहे महाराष्ट्रासाठी. राहता राहिला प्रश्न फुकट धान्याचा.. या देशातील लोक फुकट धान्य मागत नाही येत. त्यांच्या पिकाला वाजवी दाम मागतात ते! ते तुमच्या सरकारकडून होणे नाही, असा निशाणा अंबादास दानवे यांनी साधला.

रेल्वे ब्रिटिशांनी निर्माण केली अन् काँग्रेसने वाढवली-

रेल्वे भारतीय संपत्ती आहे. भाजपाच्या बापाची नाही. रेल्वे ब्रिटिशांनी निर्माण केली आणि काँग्रेसने वाढवली. दोन-चार नवीन ट्रेन तुम्ही सुरू केल्या, त्या मालकीच्या आहेत का, देश तुमच्या मालकीचा आहे का, या देशाची सार्वजनिक मालमत्ता आहे, तुमची नाही. भाजपावाले मुर्ख आहेत. त्यांना काऊंसिलिंगची गरज आहे, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून हल्लाबोल केला. 

Web Title: Thackeray group leader Abandas Danve has criticized Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.