ठाकरेंनी म्हणावे, ‘रात गई बात गई’! त्यांना बरोबर घेऊ- चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2023 10:12 AM2023-04-08T10:12:55+5:302023-04-08T10:13:15+5:30

"पवार ठाकरेंची माती करतील"

Thackeray should say, 'Raat gayi baat gayi'! Let's take them right - Chandrakant Patil | ठाकरेंनी म्हणावे, ‘रात गई बात गई’! त्यांना बरोबर घेऊ- चंद्रकांत पाटील

ठाकरेंनी म्हणावे, ‘रात गई बात गई’! त्यांना बरोबर घेऊ- चंद्रकांत पाटील

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: ‘उद्धव ठाकरेंनी म्हणावे रात गई बात गई, आम्ही त्यांना बरोबर घेऊ. देवेंद्र फडणवीस किती मोठ्या मनाचे आहे ते मला माहिती आहे. ते दरवाजे बंद करणारे नाहीत,’ असे सूचित करत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, ठाकरे यांनी विचार करावा, शरद पवार त्यांच्या पक्षाची माती करतील असे सांगितले.

ठाकरे यांनी पुन्हा भाजपबरोबर येण्याचे काही संकेत दिले आहेत का, असा प्रश्न एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस किती मोठ्या मनाचे आहेत ते मला माहिती आहे. ते दरवाजे बंद करणाऱ्यातले नाहीत. 

मात्र त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रात गई बात गई असे म्हणायला हवे. त्यांनी ३३ महिने त्यांचे दरवाजे बंद ठेवले आहेत. एकदाही त्यांनी घरी या, एकत्र बसू असे म्हटलेले नाही.”  शरद पवार यांच्या मागे गेल्याने अनेक नेत्यांची माती झाली. तसेच ते पक्ष म्हणून ठाकरेंचीही माती करतील असे म्हणत पाटील यांनी पवार यांनाही लक्ष्य केले.

उद्धव यांनीच मोदींशी जुळवून घ्यावे : केसरकर

कोल्हापूर : ‘उद्धव ठाकरे हे दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले व त्यांना दिलेले वचनही ठाकरे यांनी मोडल्याने पंतप्रधानांचा अपमान झाला. त्यामुळे लहान भाऊ म्हणून ठाकरे यांनीच मोदी यांच्याशी जुळवून घेतले पाहिजे. आम्ही त्यासाठी हवे तेवढे प्रयत्न केले, परंतु ते घडले नाही,’ असे कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 

Web Title: Thackeray should say, 'Raat gayi baat gayi'! Let's take them right - Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.