मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू

By Admin | Published: May 26, 2017 06:03 AM2017-05-26T06:03:35+5:302017-05-26T06:05:48+5:30

रत्नागिरी- मुम्बई गोवा महामार्गावर सावर्डे आगवे वळणावर अपघात झाला आहे.

Three people die on the Mumbai-Goa highway, a major accident | मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

रत्नागिरी, दि. 26 - रत्नागिरी- मुम्बई गोवा महामार्गावर सावर्डे आगवे वळणावर अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तर या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. आज पहाटे सव्वा चारच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला आहे. चालकाचा आपल्या हातातील वाहनावरील नियंत्रणाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. 
मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी विशाल ट्रॅव्हल्स गाडी नंबर एम एच 46 जे 5252 ही गाडी  महामार्गावरील सावर्डे आगवे वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने उलटली. या गाडीत एकूण 47 प्रवासी होते. यामधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींचा आकडा अद्याप समजू शकला नाही. उपचारासाठी जखमींना जवळील डेरवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री हे सर्व प्रवासी परेल, मुंबई येथून मालवणला प्रवास करीत असतांना हा अपघात झाला आहे.

 

Web Title: Three people die on the Mumbai-Goa highway, a major accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.