बकाल शहर हा कलंक पुसलाच पाहिजे - उद्धव ठाकरे

By admin | Published: May 8, 2016 02:27 AM2016-05-08T02:27:02+5:302016-05-08T02:27:02+5:30

भारतातल्या बकाल शहरांमध्ये कल्याण-डोंबिवली शहरांची नावे आली आहेत. सर्वेक्षणाच्या अहवालातून हे समोर आले तेव्हा प्रचंड दु:ख झाले. तेव्हाच माझ्या कल्याण-डोंबिवलीला

Uddhav Thackeray should be forced to wipe the balak city | बकाल शहर हा कलंक पुसलाच पाहिजे - उद्धव ठाकरे

बकाल शहर हा कलंक पुसलाच पाहिजे - उद्धव ठाकरे

Next

डोंबिवली : भारतातल्या बकाल शहरांमध्ये कल्याण-डोंबिवली शहरांची नावे आली आहेत. सर्वेक्षणाच्या अहवालातून हे समोर आले तेव्हा प्रचंड दु:ख झाले. तेव्हाच माझ्या कल्याण-डोंबिवलीला लागलेला कलंक पुसला पाहिजे, असा चंग मी बांधला. त्याला माझ्या शिवसैनिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून आगामी ५ वर्षांत हा कलंक पुसला जाईल, असे आश्वासन मी तुम्हाला देतो, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी रात्री येथे केले.
‘परिवर्तन’ या संकल्पनेंतर्गत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ जिमखाना येथील पटांगणात ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली झाला. त्यावेळी रश्मी ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते. या शहरांमधील नागरिक सुज्ञ, सुजाण आहेत ते देखील शहर स्वच्छ राखण्यासाठी विशेष प्रयत्न करतील अशी अपेक्षा उद्धव यांनी व्यक्त केली.

Web Title: Uddhav Thackeray should be forced to wipe the balak city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.