Vidhan Parishad Election: 'ती' २ मते बाद?; भाजपा-राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 08:42 PM2022-06-20T20:42:36+5:302022-06-20T20:43:01+5:30

विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान झाले. एकूण २८८ आमदारांपैकी २८५ आमदारांनी मतदान केले

Vidhan Parishad Election Results: One vote out of BJP and NCP quota | Vidhan Parishad Election: 'ती' २ मते बाद?; भाजपा-राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता 

Vidhan Parishad Election: 'ती' २ मते बाद?; भाजपा-राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता 

googlenewsNext

मुंबई - विधान परिषदेच्या १० जागांसाठी सोमवारी मतदान पार पडले. यात २८५ आमदारांनी मतदान केले. छाननीत ही सर्व मते वैध ठरवण्यात आली. परंतु त्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला. राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांच्या मतपत्रिकेवर हा आक्षेप आहे. तिसऱ्या क्रमांकाचं मत देताना ओव्हर रायटिंग करण्यात आल्याने हा आक्षेप घेतला आहे. 

भाजपाच्या या आक्षेपावरून भाजपा-मविआ यांच्यात वाद झाला. २८५ मतांची छाननी पूर्ण झाली त्याचवेळी शेलारांनी एका मतपत्रिकेवर तिसऱ्या पसंतीचे मत देताना ओव्हर रायटिंग करण्याचा प्रयत्न झाला आहे. जेणेकरून हे मत कुणी दिले हे कळून येईल असं भाजपा नेते शेलारांचा आक्षेप आहे. परंतु शेलारांच्या आक्षेपाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध दर्शवला. त्यामुळे मतमोजणीला पुन्हा विलंब झाला. भाजपाच्या आक्षेपानंतर रामराजे कोट्यातलं ते मत बाजूला काढलं आहे. त्यानंतर मविआनेही भाजपा उमेदवार उमा खापरे यांच्या एका मतावर आक्षेप घेतला. त्यानंतर ही दोन्ही मते बाद करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

काँग्रेसचा आक्षेप, मतमोजणीला विलंब
विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान झाले. एकूण २८८ आमदारांपैकी २८५ आमदारांनी मतदान केले. तर नवाब मलिक, अनिल देशमुख यांना हायकोर्टाने मतदानाची परवानगी नाकारली तर शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाले आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी काँग्रेसनं भाजपाचे उमेदवार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला. जगताप, मुक्ता टिळक यांनी मदतनीसाच्या माध्यमातून हे मत दिले असा आक्षेप काँग्रेसनं घेतला. त्यासाठी काँग्रेसनं राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांसह केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यामुळे विधान परिषदेच्या मतमोजणीला विलंब झाला. 

निवडणूक आयोगाने आक्षेप फेटाळला
भाजपाचे पाचही उमेदवार निवडून येतील याची खात्री आहे असा दावा भाजपा नेते करत होते. काँग्रेसचे आक्षेप राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळले आहेत परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय राखून ठेवत मतमोजणीला सुरुवात करण्याचे आदेश दिले. सुकृतदर्शनी आक्षेप योग्य नसल्याने मतमोजणीला सुरुवात करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले असेल असं भाजपाचे आमदार राहूल नार्वेकर यांनी सांगितलं. 
 

Web Title: Vidhan Parishad Election Results: One vote out of BJP and NCP quota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.