भिंत अंगावर काेसळून महिलेसह शेळ्या जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:16 AM2021-09-02T04:16:59+5:302021-09-02T04:16:59+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : पावसामुळे मातीसाेबतच लगतची विटांची भिंती काेसळली. त्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने वृद्ध महिलेसह चार शेळ्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : पावसामुळे मातीसाेबतच लगतची विटांची भिंती काेसळली. त्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने वृद्ध महिलेसह चार शेळ्या जखमी झाल्या. शिवाय, दाेन्ही घरांतील संसारोपयाेगी साहित्याचे नुकसान झाले. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) येथे साेमवारी (दि. ३०) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
कमलाबाई दशरथ कळंब, रा. जलालखेडा, ता. नरखेड असे जखमी महिलेचे नाव आहे. जलालखेडा येथील वाॅर्ड क्रमांक-३ मध्ये नामदेव बाजीराव कळंबे व रवींद्र दशरथ कळंबे यांची घरे जवळजवळ आहेत. पावसाचे पाणी मुरल्याने साेमवारी सायंकाळी रवींद्र कळंबे यांच्या घराची मातीची भिंत काेसळली. या भिंतीच्या मातीच्या वजनामुळे नामदेव कळंबे यांच्या घराची विटांची भिंतही काेसळली.
या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने कमलाबाई व त्यांच्या घरातील चार शेळ्या जखमी झाल्या. ढिगाऱ्याखाली कमलाबाई दबल्याचे लक्षात येताच नागरिकांनी माती बाजूला करून त्यांना बाहेर काढले व स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचाराला नेले.
जिल्हा परिषद सदस्य प्रीतम कवरे, पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, कुलदीप हिवरकर यांनी घरांची पाहणी केली. तलाठी पीयूष गाेमाटे यांनी मंगळवारी सकाळी पंचनामा केला असून, अहवाल तहसीलदारांकडे पाठविला असल्याचे सांगितले. दाेन्ही कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
...
अनर्थ टळला
ही दाेन्ही घरे छाेटी आहेत. भिंती काेसळल्या त्यावेळी घरांमधील सदस्य मुख्य खाेलीत नव्हते. या खाेल्यांमध्ये घरांमधील सर्व सदस्य झाेपत असल्याने या भिंती मध्यरात्री काेसळल्या असत्या तर अनर्थ झाला असता. यात दाेन्ही घरांतील टीव्ही, फ्रीज, दिवाण, कपाट, सोफा, धान्य व इतर वस्तू खराब झाल्याने दाेन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दाेघांनीही दिली.