राज्यात अवघ्या पाच महिन्यात ६४३७ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू

By नरेश डोंगरे | Published: July 1, 2023 03:08 PM2023-07-01T15:08:11+5:302023-07-01T15:56:25+5:30

महाराष्ट्रात अपघाताचे भयावह चित्र : एकीकडे रस्ते चांगले झाले, दुसरीकडे अपघातही वाढले  

In just five months, 6437 people died in road accidents in the state | राज्यात अवघ्या पाच महिन्यात ६४३७ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू

राज्यात अवघ्या पाच महिन्यात ६४३७ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू

googlenewsNext

नरेश डोंगरे

नागपूर : रस्ते हे विकासाचे प्रतिक असतात, असे म्हटले जाते. मात्र, विकासाचे हेच प्रतिक विनाशाचे कारण बनल्याचे भयावह चित्र गेल्या काही दिवसांत बघायला मिळत आहे. राज्यात गेल्या अवघ्या पाच महिन्यात ६४३७ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. थरकाप उडविणारी महाराष्ट्रातीलअपघाताची गेल्या दोन वर्षांची आकडेवारी लोकमतच्या हाती आली आहे.

नागपूर ते पुणे अशा प्रवासाला निघालेली विदर्भ ट्रॅव्हल्सची प्रवासी बस समृद्धी महामार्गावर उलटली आणि तिला आग लागून त्यात २५ जणांचा होपळून मृत्यू झाला. राज्यातील अलिकडच्या काळातील सर्वात भीषण अपघात ठरलेल्या या अपघाताने राज्यभरातील जीवघेणे अपघात पुन्हा एकदा चर्चेला आले आहेत. या पार्श्वभूमीवर, गेल्या दोन वर्षांचा अपघातांचा आढावा घेतल्यास कुणाच्याही काळजाचा थरकाप उडावा, अशी स्थिती आहे.

त्यानुसार, जानेवारी ते मे २०२२ या कालावधीत राज्यात ६,३३७ अपघात झाले. त्यात ९, ९१५ जणांचा मृत्यू झाला. ८,६१० गंभीर जखमी झाले. तर, ३३६४ जण किरकोळ जखमी झाले. जानेवारी ते मे २०२३ या पाच महिन्यांच्या कालावधीत राज्यातील विविध भागात ५,८९७ अपघात होऊन त्यात ६४३७ जणांचा मृत्यू झाला. ८६५७ जण जबर जखमी झाले तर ३४१५ जणांना किरकोळ दुखापत झाली. अपघाताची ही आकडेवारी कुणाच्याही मनाचा हिय्या करणारी ठरावी.

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा; 'त्या' बसबाहेर आयुषला जिवंत पाहून मिठीच मारली

आश्चर्यजनक आणि खेदजनकही

यातील सर्वात आश्चर्यजनक आणि खेदजनक बाब अशी आहे की, महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था गेल्या दोन वर्षांत कमालीची सुधारली आहे. गावोगावचे रस्ते प्रशस्त आणि चकचकीत झाले आहे. चांगले रस्ते झाले की अपघात कमी होतील, असा दावा अन् अंदाजही होता. तो मात्र या अपघातांच्या आकडेवारीमुळे खोटा ठरला आहे. एकीकडे रस्ते चांगले झाले तर दुसरीकडे अपघातही वाढले, अशी सध्याची स्थिती आहे.

*अपघाताचे प्रमाण सर्वात जास्त असलेले १० जिल्हे*

२०२२ मध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त ८५५ अपघात मुंबईत झाले. त्यात १७५ जणांचा मृत्यू झाला तर ७५५ जण जखमी झाले.

  • अहमदनगर : अपघात - ७१४, मृत्यू -३८३, जखमी - ४४९
  • पुणे : अपघात - ६९४, मृत्यू - ३९०, जखमी - ६०७
  • कोल्हापूर : अपघात - ५४४, मृत्यू -२११, जखमी - ५५३
  • नागपूर : अपघात - ४८९, मृत्यू -२३०, जखमी - ५९८
  • सोलापूर : अपघात - ४६८, मृत्यू - २८३, जखमी - ४९१
  • चंद्रपूर : अपघात - ४१५, मृत्यू - २१८, जखमी -३०७
  • पिंपरी चिंचवड : अपघात - ४०१, मृत्यू - १५५, जखमी - ३०२
  • सांगली : अपघात -३६०, मृत्यू - १८७, जखमी -२८३
  • ठाणे : अपघात - ३५९, मृत्यू - ०९४, जखमी - ३१८

 

२०२३ मध्ये मुंबईत ४३९ अपघात झाले. त्यात ११३ जणांचा मृत्यू झाला तर ४०२ जण जखमी झाले.

  • अहमदनगर : अपघात -७४४, मृत्यू -३६५, जखमी - ५६९
  • पुणे : अपघात - ७२९, मृत्यू -३८५, जखमी - ६८९
  • कोल्हापूर : अपघात - ४७८, मृत्यू -१८२, जखमी - ४०४
  • नागपूर : अपघात - ४२७, मृत्यू -१९५, जखमी - ५४४
  • सोलापूर : अपघात - ५००, मृत्यू - २८३, जखमी - ४६८
  • चंद्रपूर : अपघात -३५५, मृत्यू -१५६, जखमी -३१२
  • पिंपरी चिंचवड : अपघात - ५०८, मृत्यू - १४७, जखमी - ३९५
  • सांगली : अपघात -३५८, मृत्यू - १७३, जखमी -२३२
  • ठाणे : अपघात - ३८१, मृत्यू - ०८८, जखमी -३४३

 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: In just five months, 6437 people died in road accidents in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.