शेतकऱ्यांनी किटकनाशके काळजीपूर्वक हाताळावी : कृषी विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:12 PM2018-08-03T12:12:22+5:302018-08-03T12:15:55+5:30

शेतकऱ्यांनी विविध पिकांवर व फळबागांवर किटकनाशकांची फवारणी करतांना विषबाधा होऊ नये,  आणि गतवर्षी राज्यातील विविध भागात घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना किटनाशक काळजीपूर्वक हाताळण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे.

Appeal to farmers to handle pesticides carefully | शेतकऱ्यांनी किटकनाशके काळजीपूर्वक हाताळावी : कृषी विभाग

शेतकऱ्यांनी किटकनाशके काळजीपूर्वक हाताळावी : कृषी विभाग

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांनी किटकनाशके काळजीपूर्वक हाताळावीविषबाधा टाळण्यासाठी कृषी आयुक्तांचे शेतकऱ्यांना आवाहन

नाशिक : शेतकऱ्यांनी विविध पिकांवर व फळबागांवर किटकनाशकांची फवारणी करतांना विषबाधा होऊ नये,  आणि गतवर्षी राज्यातील विविध भागात घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना किटनाशक काळजीपूर्वक हाताळण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे. शेतातील वेगवेगळ्या पिकात फवारणी करताना किटकनाशक नाक, त्वचा, तोंडाद्वारे शरीरात गेल्याने विषबाधा होत असल्याच्या घटना नाशिक जिल्ह्यातही  काहीवेळा घडलेल्या आहेत. त्यामुळे फवारणी करतांना शिफारशी प्रमाणे योग्य प्रमाणात किटकनाशकांचा वापर करावा. शिफारस नसतांना दोन व दोन पेक्षा जास्त किटकनाशकांचे मिश्रण करु न फवारणी करण्यात येऊ नये. किटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी संरक्षक कपडे, बुट, हातमोजे, नाकावरील मास्कचा वापर करावा. शरीरावर जखमा किंवा आजारी असल्यास फवारणी करणे टाळावे. अपघाताने विषबाधेची दुर्घटना घडल्यास तात्काळ प्रथमोचार करावेत व विनाविलंब बाधित रुग्णास जवळच्या दवाखान्यात घेऊन जावे अशा सुचना कृषी  आयुक्तालयातर्फे करण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यातील सर्व किटकनाशके विक्रेत्यांनी किटकनाशकांची विक्री करतांना संरक्षीत किट उपलब्ध करुन देणे अनिवार्य असल्याच्या सूचना कृषी विभागाने केल्या आहेत. तसेच अतिरिक्त संरक्षीत किट विक्रीसाठीही उपलब्ध ठेवण्यात यावेत, असे निर्देश कृषी संचालकांतर्फे करण्यात आले आहेत 

मजुरांनाही संरक्षक किट द्या
शेतकरी/शेतमालक मजूराकडून फवारणी करुन घेतात. अशावेळी शेतकरी/ शेतमालकाने नैतिक जबाबदारी पाळून फवारणी करणाºया शेतमजूरास संपूर्ण शरीर झाकले जाईल असे सरंक्षण किट्स द्यावे व फवारणी समक्ष करु न घेण्यात यावी. विषबाधेची लक्षणे दिसताच जवळच्या दवाखान्यात घेवून जावे. तसेच अशा विषबाधेची माहिती तात्काळ ग्रामपंचायत, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक व जवळच्या पोलिस स्टेशनला द्यावी असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे. 

Web Title: Appeal to farmers to handle pesticides carefully

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.