विषमतेविरूद्ध समतेचा लढा :  प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:48 AM2018-07-30T00:48:09+5:302018-07-30T00:48:50+5:30

कॉँग्रेस सरकारचा नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याने लोकांनी त्यांना सत्तेवरून बाजूला केले आणि भाजपाला बहुमत दिले. यामुळे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले; मात्र या चार वर्षांत मोदी सरकार कॉँग्रेसपेक्षाही अधिक निष्क्रिय आणि जाती-धर्माचे विष कालवणारे सरकार म्हणून समोर आले.

 Fighting against equality: Prakash Ambedkar | विषमतेविरूद्ध समतेचा लढा :  प्रकाश आंबेडकर

विषमतेविरूद्ध समतेचा लढा :  प्रकाश आंबेडकर

googlenewsNext

नाशिक : कॉँग्रेस सरकारचा नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याने लोकांनी त्यांना सत्तेवरून बाजूला केले आणि भाजपाला बहुमत दिले. यामुळे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले; मात्र या चार वर्षांत मोदी सरकार कॉँग्रेसपेक्षाही अधिक निष्क्रिय आणि जाती-धर्माचे विष कालवणारे सरकार म्हणून समोर आले. विषमतावादा विरूद्ध समतेची ही निर्णायक लढाई असून स्वातंत्र्यदिनानंतर मोदींची लक्तरे वेशीवर टांगल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी राहणार नाही, असा एल्गार आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी जिल्हा मेळाव्यात पुकारला.  ‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने रविवारी (दि.२९) भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात संवाद यात्रेअंतर्गत जिल्हा मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात आंबेडकरप्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष पवन पवार, खंडेराव पाटील, किशोर दमाळे, अ‍ॅड. विजय मोरे, बाजीराव तिडके, जावेद मुन्शी, अ‍ॅड. अरुण जाधव यांसह विविध बारा बलुतेदार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी समाजबांधवांनी ‘बोलो-बोलो जय भीम’चा नारा बुलंद करत अवघे सभागृह दणाणून सोडले. यावेळी आंबेडकर म्हणाले, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाच्या पंतप्रधानांचे होणारे भाषण हे महत्त्वाचे असते.  त्यामुळे या पार्श्वभूमीवर राज्यातील अन् देशातील वातावरण अस्थिर करण्याचा आमचा हेतू नाही; मात्र स्वातंत्र्यदिनानंतर भाजपा सरकार आणि नरेंद्र मोदी यांची लक्तरे चव्हाट्यावर आणण्याची मोहीम हाती घेऊ. मोदींनी या देशातील शेतकऱ्यांना हमीभाव वाढीचे दिलेले आश्वासन हे फसवे आहे; कारण या सरकारने अंदाजपत्रकात अन्नधान्य खरेदीसाठी तशी कुठलीही तरतूद केलेली नाही. जेव्हा या देशातील शेतकºयांना हे लक्षात येईल, की सरकारने रंगविलेले हमीभाववाढीचे स्वप्न भंगले आहे, तोपर्यंत केंद्राकडून लोकसभेची निवडणूक जाहीर केली जाईल, असे आंबेडकर यावेळी म्हणाले. आगामी निवडणुकांमध्ये आपल्या मताचा योग्य वापर करून आश्वासनांची खैरात आणि विषमता पोसणारे मनुवादी व्यवस्थेला खतपाणी घालणारे सरकार उधळून लावण्याचे महत्त्वाचे कार्य बहुजनांना करायचे असल्याचे अवाहन त्यांनी यावेळी केले.
या राज्यात अन् देशात विषमतेला सर्वप्रथम महात्मा जोतिबा फुले यांनी सुरुंग लावला. त्यानंतर पुन्हा विषमता आणि मनुवादी व्यवस्थेच्या विचारसरणीने डोके वर काढले आहे. ही व्यवस्था उधळून लावण्यासाठी समतेचा हा विषमतेविरुद्धचा हा अखेरचा मोठा लढा असणार आहे. यामुळे सर्व वंचित समाजघटकांनी एकत्र येऊन सत्ता काबीज करण्यासाठी एकजुटीची ताकद पणाला लावावी.

Web Title:  Fighting against equality: Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.