प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे पाच रेल्वे गाड्या केल्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 00:04 IST2021-05-17T22:55:20+5:302021-05-18T00:04:21+5:30
मनमाड : प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने पाच प्रवासी गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे पाच रेल्वे गाड्या केल्या रद्द
मनमाड : प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने पाच प्रवासी गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रेन नंबर ०२१६९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर दैनिक विशेष यात्रा आरंभ दिनांक २० मेपासून आणि ट्रेन नंबर ०२१७० नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनिक विशेष यात्रा आरंभ दिनांक १९ मेपासून पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. ट्रेन नंबर ०२१५३ लोकमान्य तिलक टर्मिनस - हबीबगंज साप्ताहिक विशेष यात्रा आरंभ दिनांक २७ मेपासून आणि ट्रेन नंबर ०२१५४ हबीबगंज - लोकमान्य तिलक टर्मिनस साप्ताहिक विशेष यात्रा आरंभ दिनांक २८ मेपासून पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
तसेच गुजरातमधील चक्रीवादळाच्या सतर्कतेमुळे ट्रेन नंबर ०८४०२ डाऊन ओखा - पुरी विशेष यात्रा आरंभ दिनांक १९ मे रोजी रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (१७ मनमाड)