पावसामुळे भुईमूग पिकास फटका

By admin | Published: November 22, 2015 11:47 PM2015-11-22T23:47:49+5:302015-11-22T23:48:52+5:30

पावसामुळे भुईमूग पिकास फटका

Groundnut crop due to rain caused by crop failure | पावसामुळे भुईमूग पिकास फटका

पावसामुळे भुईमूग पिकास फटका

Next

मातोरी : गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे मातोरीसह परिसरातील पिकांचे नुकसान झाले असून सर्वाधिक फटका भुईमूग पिकास बसला आहे. भुईमुगाबरोबरच द्राक्ष आणि टोमॅटो पिकाचेदेखील नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली असून शेतपिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्न करावे लागले. भुईमूग शेंगा काढणी सुरू असतानाच पाऊस झाल्याने काढलेल्या शेंगा ओल्या झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर उभ्या असलेल्या भुईमुगावर आता रोग पडण्याचीदेखील शक्यता वर्तविली जात आहे.
पिकांवर भुरी, डावण्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी पिकांवर बुरशीनाशक व किटकनाशक फवारणी सुरू केली आहे. यामुळे उत्पादनखर्च वाढणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Groundnut crop due to rain caused by crop failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.