मनमाड येथे पाच वर्षांनंतर दाखल झाला खुनाचा गुन्हा

By admin | Published: February 21, 2016 09:49 PM2016-02-21T21:49:33+5:302016-02-21T21:56:40+5:30

मनमाड येथे पाच वर्षांनंतर दाखल झाला खुनाचा गुन्हा

Manmad has been killed five years after murder | मनमाड येथे पाच वर्षांनंतर दाखल झाला खुनाचा गुन्हा

मनमाड येथे पाच वर्षांनंतर दाखल झाला खुनाचा गुन्हा

Next

मनमाड : पाच वर्षांपूर्वी रेल्वेतून पडून मयत झालेल्या युवकाचा घातपात झाला असल्याची फिर्याद युवकाच्या पालकांनी मनमाड लोहमार्ग पोलिसांत दिल्याने सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दादालाल शंकर पाटील, रा. केडगाव, जि. अहमदनगर यांनी फिर्याद दिली. त्यांचा मुलगा प्रतीक याचा २६ सप्टेंबर २०१० रोजी कोपरगाव रेल्वेस्थानकाजवळ अपघाती मृत्यू झाला. त्याचा मृत्यू अकस्मात न होता खून झाला असल्याचा संशय त्याच्या पालकांना होता. या प्रकरणी संशयित आरोपी वैभव रोहम (रा. कुंभारी),
स्वप्नील वाघमारे (रा. कोपरगाव), त्रिलोक पवार (रा. हिंगणी), कपिल पवार (रा. कोपरगाव), राजेंद्र कापगते, पंकज पाटील (रा. कोपरगाव) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Manmad has been killed five years after murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.