बारा जणांचे बळी घेणाऱ्या त्या चौकातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2022 12:12 PM2022-10-20T12:12:15+5:302022-10-20T12:15:05+5:30

यवतमाळ- मुंबई या चिंतामणी ट्रॅव्हलच्या खाजगी बसला हॉटेल मिरची या चौकात अपघात झाला त्यानंतर बसने पेट घेतल्याने बारा जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.

The encroachment removal work start of that square which killed twelve people in Nashik | बारा जणांचे बळी घेणाऱ्या त्या चौकातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात

बारा जणांचे बळी घेणाऱ्या त्या चौकातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात

googlenewsNext

संदीप झिरवाळ

नाशिक-  गेल्या आठ ऑक्टोबरला नाशिक शहरातील पंचवटी भागात औरंगाबाद रोडवर एका खाजगी ट्रॅव्हल बसला अपघात झाल्याने बारा जणांचा मृत्यू झाला होता या चौकातील अतिक्रमण काढण्यास आज पासून सुरुवात झाली आहे.

यवतमाळ- मुंबई या चिंतामणी ट्रॅव्हलच्या खाजगी बसला हॉटेल मिरची या चौकात अपघात झाला त्यानंतर बसने पेट घेतल्याने बारा जणांचा होरपळून मृत्यू झाला तर तीसहुन अधिक प्रवासी जखमी झाले होते त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने चौक अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार नाशिक महापालिकेने चौकातील सर्व अतिक्रमण धारकांना नोटीस बजावल्या होत्या काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली बांधकामे काढून घेतली असली तरी महापालिकेने मुदत देऊनही काहींनी अतिक्रमण न काढल्याने आजपासून या चौकात घडत अतिक्रमण मोहीम सुरू करण्यात आली आहे.
 

Web Title: The encroachment removal work start of that square which killed twelve people in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक