पाणी आरक्षण; काठोकाठ वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 01:09 AM2017-07-20T01:09:07+5:302017-07-20T01:09:47+5:30

मनपाचे काटेकोर नियोजन : चार हजार दलघफू पाणी उचल

Water reservation; Use it to the brim | पाणी आरक्षण; काठोकाठ वापर

पाणी आरक्षण; काठोकाठ वापर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि दारणा धरणातील एकूण ४३०० दलघफू पाणी आरक्षण महापालिकेसाठी दि. १५ आॅक्टोबर २०१६ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीसाठी निश्चित करण्यात आले होते. महापालिकेने २७५ दिवसांत पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करत आतापर्यंत ४ हजार दलघफू पाण्याची उचल केली असून, प्रतिदिन १४.७३ दलघफू पाणी उचल लक्षात घेता ३१ जुलैपर्यंत गंगापूर धरणातील आरक्षण पूर्ण होणार आहे. भविष्यात पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता महापालिकेला सप्टेंबर २०१७ मध्ये गंगापूर धरणाच्या पाणी आरक्षणासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे वाढीव मागणी नोंदवावी लागणार आहे.
दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०१५ मध्ये गंगापूर धरणातील पाणी मराठवाड्याला सोडण्यावरून मोठा संघर्ष निर्माण झाला होता. त्यावेळी पाणी आरक्षण निश्चित करण्यावरूनही महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी विरुद्ध शासन असा सामनाही रंगला होता. सन २०१६ मध्ये समाधानकारक पावसामुळे गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने आवर्तनावरून वादाचा प्रसंग आला नाही.
सप्टेंबर २०१६ मध्ये महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे गंगापूर आणि दारणा धरण मिळून ४६०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी नोंदविली होती. मात्र, जलसंपदा विभागाने १५ आॅक्टोबर २०१६ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीकरिता गंगापूर धरणातील ३९०० दलघफू तर दारणातील ४०० दलघफू याप्रमाणे एकूण ४३०० दलघफू पाणी आरक्षित केले. यापूर्वी दारणा धरणातील ५०० दलघफू पाणी आरक्षित केले जात होते. परंतु दारणाचा पाणी उपसा करण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने दारणातील पाणी आरक्षण घटवत दारणातील पाणी आरक्षणाचा प्रश्नमहापालिकेसाठी दारणा धरणातून पाणी आरक्षित केले जात असले तरी आजवर केवळ ३०० दलघफूच्या आसपासच पाणी उचल करू शकले आहे. ज्यावेळी चेहेडी बंधाऱ्याला आवर्तन असते त्याचवेळी पाणी उचल करता येते. त्यामुळे दारणातील पाणी आरक्षणाचा फारसा उपयोग मनपाला होत नाही. त्यासाठीच महापालिकेने दारणातील आरक्षण कमी करून ते गंगापूर धरणात वाढवून देण्याची मागणी सातत्याने लावून धरलेली आहे. यंदाही महापालिकेला आरक्षित ४०० दलघफू पाण्यापैकी २७४.३२ दलघफू पाणीच उचलता आले आहे. मनपात आता भाजपा सत्तेवर असल्याने सत्ताधारी दारणाच्या आरक्षणाचा प्रश्न कसा मार्गी लावतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Water reservation; Use it to the brim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.