तुमची ऑनलाइन फसवणूक झालीय?, मग वाचा RBIचे नवीन गाइडलाइन्स

By Admin | Published: July 7, 2017 12:37 PM2017-07-07T12:37:49+5:302017-07-07T12:45:29+5:30

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी करुन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.

Are you cheated online ?, then read RBI's new guides | तुमची ऑनलाइन फसवणूक झालीय?, मग वाचा RBIचे नवीन गाइडलाइन्स

तुमची ऑनलाइन फसवणूक झालीय?, मग वाचा RBIचे नवीन गाइडलाइन्स

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी करुन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. एखाद्या ग्राहकाच्या बँक खात्यांमध्ये ऑनलाइन फसणवूक झाल्यास त्याद्वारे होणा-या नुकसानाची जबाबदारी आता ग्राहक नाही तर बँक स्वीकारणार आहेत. यासाठी ऑनलाइन फसवणूक झाल्याच्या तीन दिवसांच्या आत ग्राहकाला तक्रार नोंदवणं आवश्यक आहे. 
 
ज्या दिवशी तुम्ही तक्रार नोंदवला, त्यानंतर 10 दिवसांच्या आत तुमच्या खात्यातून फसवणुकीद्वारे गेलेली रक्कम क्रेडिट करण्यात येईल. मात्र ग्राहकाकडून फसवणुकीची माहिती देण्यास 3 दिवसांहून अधिक कालावधी लागल्यास ग्राहकालाच 25,000 रुपयांपर्यतचे नुकसान सहन करावे लागेल. इंटरनेट बँकींग करणा-या ग्राहकाचं खाते आणि कार्डमधून अनधिकृतरित्या होणा-या व्यवहारांची प्रकरणं मोठ्या प्रमाणात समोर आली आहेत. ग्राहकांच्या तक्रारी लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ही मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहे. 
 
TERMS AND CONDITIONS APPLY 
 
मात्र, जर एखाद्या खातेदारानं स्वतःहून आपला पासवर्ड भलत्याच व्यक्तीसोबत शेअर केला आणि त्यानंतर फसवणूक झाल्याची बाब समोर आल्यास, या घटनेस संबंधित ग्राहक स्वतःच जबाबदार असतील,असेही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं स्पष्ट केले आहे.  ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांपासून वाचण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं प्रत्येक व्यवहारासंदर्भात संदेश आणि ई-मेल अलर्ट जारी केले आहेत.  अलर्टसोबत रिप्लायचा ऑप्शनही देण्यात आला आहे.
 
आणखी बातम्या वाचा
(ऑनलाइन शॉपिंग करताय.जरा सांभाळून)
(जाणून घ्या, तुमचा ऑनलाइन डेटा किती सुरक्षित?)
(आता पीएफ काढता येणार ऑनलाइन)
 
 
ऑनलाइन फसवणुकीपासून सतर्क करण्यासाठी मुंबई पोलिसांचा फिल्मी अंदाज
सध्याचं जग हे डिजीटल झालं आहे. बरेच व्यवहार आपण ऑनलाइन करतो आहे. ऑनलाइन सेवेमुळे व्यवहार पटकन होतो तसंच आपला वेळसुद्धा वाचतो. पण या ऑनलाइन व्यवहारांचे जसे फायदे आहेत तसेच तोटेसुद्धा आहेत. अनेक फेक साइट्स आज सक्रीय झाल्या आहेत. ज्याचा सर्वसामान्य लोकांना सामना करावा लागतो आहे. या साइट्सद्वारे लोकांची फसवणूकही बऱ्याचदा होते. ऑनलाइन साइट्सची विश्वासार्हता तपासून मगच व्यवहार करा याबद्दलची बरीच जनजागृती केली जाते आहे. 
ऑनलाइन फसवणुकीपासून लोकांना सावध करण्यासाठी मुंबई पोलिसांनीही पुढाकार घेतला आहे. मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून पुन्हा एकदा अनोख्या पद्धतीने नागरिकांना आवाहन केलं आहे. पोलिसांनी "अग्निपथ" सिनेमातील अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध डायलॉगसह त्यांचा फोटो शेअर केला आहे
 
ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या प्रकारांमुळे पोलीस सतत नागरिकांना सतर्क करत असतात. तरीही अनेक जण त्याला बळी पडतात. हे प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी "अग्निपथ"मधील अमिताभचा "पूरा नाम, विजय दीनानाथ चौहान... !" हा डायलॉग फोटोवर लिहीत शेअर केला आणि त्याबरोबर सतर्कतेचा इशाराही दिला आहे. 
 
मुंबई पोलिसांनी हा प्रयोग पहिल्यांदाच केलेला नाही. यापूर्वीही त्यांनी मनोरंजनाच्या माध्यमातून सतर्कतेचे संदेश दिले आहेत. यावेळी पासवर्ड, ओटीपी, एटीएम पिन नंबर अशी माहिती शेअर करू नये, असं आवाहन करण्यासाठी "अग्निपथ"मधील डायलॉगचा उपयोग करण्यात आला आहे. ऑनलाइनवर "हिरोगिरी" करू नका, असं आवाहन पोलिसांनी ट्विटमधून सर्वांना केलं आहे. याआधी स्वच्छतेचं आवाहन करण्यासाठी वाराणसीत अमिताभ बच्चन यांच्या "दीवार" सिनेमाचे पोस्टर्स लावण्यात आले होते.
 

Web Title: Are you cheated online ?, then read RBI's new guides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.