प.बंगालमधील जनजीवन पूर्वपदावर यायला सुरूवात

By Admin | Published: July 10, 2017 01:06 PM2017-07-10T13:06:10+5:302017-07-10T13:06:10+5:30

फेसबूकवर धार्मिक स्थळासंबंधी पोस्ट केल्याने बदुरिया आणि नॉर्थ 24 परगणाच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता.

The beginning of the life in West Bengal | प.बंगालमधील जनजीवन पूर्वपदावर यायला सुरूवात

प.बंगालमधील जनजीवन पूर्वपदावर यायला सुरूवात

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि. 10-  फेसबूकवर धार्मिक स्थळासंबंधी पोस्ट केल्याने बदुरिया आणि  नॉर्थ 24 परगणाच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता. पण आता ही तणावसदृश्य परिस्थिती निवळायला सुरूवात झाली आहे. पण तेथिल इंटरनेट सेवा अजूनही बंद आहे. फेसबूक पोस्टमुळे भडकलेल्या दंगलीनंतर सोमवारी सकाळपासून दुकानं, बाजार आणि व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत.  लोकांनी घराच्या बाहेर पडायला सुरूवात केली असून जनजीवन पूर्वपदावर यायला सुरूवात झाली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, परिसरात कुठल्याही प्रकारच्या हिंसेची घटना घडलेली नाही.   

परिसरात गस्त घालण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. इथे परिस्थिती आता सुधारते आहे. जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशी माहिती राज्याच्या गृहमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. 
 
आणखी वाचा
 

मुंबई विद्यापीठाचा अनागोंदी कारभार, फार्मसीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती

 

बजरंगी भाईजानच्या अभिनेत्रीला दोन वर्षाचा कारावास

 

एअरपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणी "चक दे" फेम नेगी होणार निलंबित?

 
 
काय आहे प्रकरण -
 
एका 17 वर्षीय विद्यार्थ्यांने फेसबूवर धार्मिक स्थळासंबंधी पोस्ट केल्याने तणाव निर्माण झाला होता. हा विद्यार्थी बदुरिया येथील राहणार आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जीना याप्रकऱणी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. परिस्थिती हाताबाहेर चालली असून केंद्राने सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना सुरक्षेसाठी पाठवलं आहे. नॉर्थ 24 परगणा येथील ही घटना आहे.
 
ममता बॅनर्जी यांनी केंद्राला फटकारले -
 
बशीरहाट व बदुरिया येथील वातावरण बिघडविण्यास आणि तिथे धार्मिक विद्वेष निर्माण करण्यास काही संघटना जबाबदार आहेत, असे सांगून, त्यांनी त्याबद्दलही नाव न घेता भाजपावर टीका केली. त्या म्हणाल्या, दोन धार्मिक संघटनांवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. बशीरहाट व बदुरिया येथील दंगलींची न्यायालयीन चौकशी केली जाईल. राज्यातील कायदा व सुव्यवस्था नीट राखण्यात केंद्र सरकार आम्हाला मदत करीत नाही, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
 
राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपा नेत्याची मागणी -
 
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली असून, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपाच्या राज्य शाखेने केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, आम्ही राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेतली आणि राज्यातील गंभीर स्थितीसाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचे सांगितले.
दंगलग्रस्त भागातील लोकांना भरपाई देण्याची मागणीही भाजपाने केली आहे. केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करत नाही, हा ममता बॅनर्जी यांचा आरोपही घोष यांनी फेटाळून लावला.
 

Web Title: The beginning of the life in West Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.