“CM उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर हनुमान चालिसा बंद करावी”; किरीट सोमय्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 03:42 PM2022-05-12T15:42:35+5:302022-05-12T15:43:30+5:30

उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारचा अंत झाल्यानंतरच आम्ही स्वस्थ बसणार आहोत, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

bjp leader kirit somaiya criticised maha vikas aghadi and cm uddhav thackeray after meet navneet rana and ravi rana in delhi | “CM उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर हनुमान चालिसा बंद करावी”; किरीट सोमय्यांचा इशारा

“CM उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर हनुमान चालिसा बंद करावी”; किरीट सोमय्यांचा इशारा

Next

नवी दिल्ली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांना हनुमान चालिसाने उत्तर देण्याच्या केलेल्या आवाहनानंतर त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. हनुमान चालिसेचा मुद्दा राज्यातील राजकारणात चांगलाच तापताना दिसत आहे. यातच आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर (Maha Vikas Aghadi) निशाणा साधला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल, तर हनुमान चालिसा, रामभक्त हनुमंतांचे कीर्तन भजन बंद करून दाखवा, असा थेट इशारा दिला आहे. 

किरीट सोमय्या यांनी दिल्लीत नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राणा दाम्पत्यांनी दिल्लीत जाऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यानंतर आता किरीट सोमय्या यांनी टीकास्त्र सोडले आहे. ठाकरे सरकारला कोर्टाच्या एवढ्या चपराक पडल्यात की, उद्धव ठाकरेंचे गाल सुजले आहेत. पोलीस प्रशासनाचा वापर सरकार माफियाप्रमाणे करत आहे. हा चिंतेचाच विषय आहे. माफियांना आम्ही ठिकाणावर आणणार असल्याचे एल्गार किरीट सोमय्या यांनी केला. 

उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर हनुमान चालिसा बंद करा

ठाकरे सरकारने हद्द केली आहे. खासदार आणि आमदारांना धमकी घेतात. वीस फुट खड्ड्यात गाढण्याची भाषा फक्त माफिया सरकार करू शकते. लोकसभा अध्यक्षांना भेटून ठाकरे सरकारच्या या माफियागिरीबद्दल तक्रार करणार आहे. गृहसचिवांचीही भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारचा अंत झाल्यानंतरच आम्ही स्वस्थ बसणार आहोत, असे ठणकावून सांगितले. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना, हिंदुस्थानचे कोट्यवधी लोक हनुमानाची पूजा करतात. आम्ही हनुमान भक्त आहोत. जेव्हा रावण जन्माला येतात, त्यांच्या लंकेला हनुमानच जाळून टाकतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हनुमान चालिसा, हनुमानाचे भजन-कीर्तन बंद करून दाखवावे, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला. 

दरम्यान, शिवसेनेच्यावतीने येत्या १४ मे रोजी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्याच दिवशी नवी दिल्लीत महाराष्ट्र सरकार विरोधात आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदबुद्धी द्यावी, यासाठी नवी दिल्लीतील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम करणा आहोत, असे रवी राणा यांनी जाहीर केले आहे. तुम्ही सभेत आम्ही मर्द आहोत. मर्दासारखे काम करतो असे वारंवार म्हणता. पण तुम्ही एका महिला खासदाराला जेलमध्ये टाकून तिला चुकीची वागणूक देऊन तुमचा नामर्दपणा दाखवून दिला आहे. तुम्ही जेव्हा भाजपाशी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलात त्याच दिवशी तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांची हत्या केली. तुम्ही त्याच दिवशी सर्व शिवसैनिकांना पोरके केले, अशी घणाघाती टीका रवी राणा यांनी केली. 
 

Web Title: bjp leader kirit somaiya criticised maha vikas aghadi and cm uddhav thackeray after meet navneet rana and ravi rana in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.