चीनची धमकी : 10 तासात आमचे जवान दिल्लीत पोहोचतील

By admin | Published: January 18, 2017 04:17 PM2017-01-18T16:17:07+5:302017-01-18T16:30:47+5:30

'जर भारत आणि चीनमध्ये युद्ध झालं तर आमचे जवान 10 तासात भारताची राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचतील',चीनची धमकी

China threat: Our troops in Delhi within 10 hours will reach Delhi | चीनची धमकी : 10 तासात आमचे जवान दिल्लीत पोहोचतील

चीनची धमकी : 10 तासात आमचे जवान दिल्लीत पोहोचतील

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 18 - 'जर भारत आणि चीनमध्ये युद्ध झालं तर आमचे जवान 10 तासात भारताची राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचतील' अशी धमकी चिनी मीडियाने दिली आहे. 'दोन देशांमध्ये युद्ध झालं तर केवळ 10 तासात पॅराशूटच्या सहाय्याने आमचे जवान राजधानी दिल्लीत पोहोचतील' असं चिथावणीखोर वक्तव्य चिनी मीडियाने केलं आहे. 

'युद्धाला सुरूवात झाल्यास  पॅराशूटच्या सहाय्याने  चीनच्या सैनिकांना दिल्लीपर्यंत पोहोचायला केवळ 10 तास लागतील तर फक्त 48 तासात आमचे जवान मोटार सायकलच्या सहाय्याने दिल्लीत पोहोचतील' असा दावा चिनच्या सरकारी टीव्ही चॅनलने केला आहे. इंटरनॅशनल स्पेक्टेटरने ट्वीटकरून याबाबत माहिती दिली. 
भारताविरोधातील चिनी मीडियाचा हा उद्वेग काही नवा नाहीये किंवा चिनी मीडियाने भारताला अशाप्रकारे धमकी देण्याचीही ही पहिलीच वेळ नाही. यापुर्वीही चिनी मीडियाने भारताविरोधात आग उकळण्याची कामं केली आहेत.गुंतवणूक  करण्यासाठी  अॅपलसारख्या मोठ्या कंपन्यां जेव्हा भारताकडे वळल्या त्यावेळीही चिनी मीडियाचा तिळपापड झाला होता.   

Web Title: China threat: Our troops in Delhi within 10 hours will reach Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.