शेतीमाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात

By admin | Published: January 31, 2017 02:06 AM2017-01-31T02:06:44+5:302017-01-31T02:06:44+5:30

नायगाव : दिवसागणीक कांद्याच्या भावात सुरु असलेल्या घसरणीमुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. कांद्याबरोबर सर्वच शेतीमालांना बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.

Farmers are facing problems due to lack of irrigation | शेतीमाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात

शेतीमाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात

Next
यगाव : दिवसागणीक कांद्याच्या भावात सुरु असलेल्या घसरणीमुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. कांद्याबरोबर सर्वच शेतीमालांना बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.
बाजारात सध्या कोबी, फ्लॉवर, टमाटे आदिंसह सर्वच भाजीपाला मातीमोल भावाने विकण्याची प्रसंगी फेकून देण्याची वेळ बळीराजावर येत आहे. गेल्या वर्षभरापासून सर्वच शेतीमालास उत्पादन खर्चही हाती पडण्याइतका दर कोणत्याच पिकातून येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या सर्वच पिकांमध्ये शेतकर्‍यांना हमखास उत्पन्न मिळवून देणार्‍या कांद्याच्या दरातही चांगलीच घसरण सुरु आहे. मोठ्या प्रमाणावर खर्च करुन प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन मोठ्या मेहनतीने पिकविलेल्या कांद्याला सध्या बाजारात ३५० ते ४५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. या भावाने शेतकर्‍यांनी पिकाच्या उत्पादनावर केलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
कधी ग्राहकांच्या तर कधी उत्पादकांच्या डोळ्यातून पाणी काढणार्‍या कांद्याचा विषय कायमच चर्चिला जातो. मात्र, अनेकदा कमी बाजार भावामुळे शेतकर्‍यांचा रास्ता रोको होवूनही शासन याकडे गांभिर्याने बघत नाही. कधीतरी कांदा भावात सुधारणा झालीत तर सर्व प्रसार माध्यमांद्वारे ग्राहकांच्या डोळ्यातून कांद्याचे काढलेले पाणी दाखवले जाते व शासनही अशावेळी तात्काळ याची दखल घेवून बाजारभाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखते. कोणतेही शासन कधीच शेतकर्‍यांच्या हिताचा निर्णय घेत नसल्याचा आजपर्यंतचा उत्पादकांचा अनुभव आहे. सध्या सर्वच शेतीमालास बाजारात मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे शेतकरी वर्गात मोठी कोंडी निर्माण झाली आहे. (वार्ताहर) (जोड)(1)

Web Title: Farmers are facing problems due to lack of irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.