चीनच्या तिबेटमधील धरणापासून भारताला 'हे' पाच धोके

By admin | Published: October 5, 2016 02:43 PM2016-10-05T14:43:55+5:302016-10-05T15:15:32+5:30

चीनने तिबेटमधून वाहणा-या यारलंग झांगबो म्हणजे ब्रम्हपुत्रा नदीवर धरण बांधणार असल्याचे म्हटले आहे. या धरणामुळे भारताला काही धोके आहेत.

Five dangers of 'this' to India from Tibetan dam in China | चीनच्या तिबेटमधील धरणापासून भारताला 'हे' पाच धोके

चीनच्या तिबेटमधील धरणापासून भारताला 'हे' पाच धोके

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ५ - भारताने पाकिस्तानबरोबर झालेल्या सिंधू पाणी वाटप करारातील आपल्या हक्काचे पाणी वापरण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर चीनने तिबेटमधून वाहणा-या यारलंग झांगबो म्हणजे ब्रम्हपुत्र नदीवर धरण बांधणार असल्याचे म्हटले आहे. चीनचा तिबेटमधील हा सर्वात महागडा प्रकल्प असून या धरणामुळे भारताला काही धोके आहेत. 
 
- चीनकडून तिबेटमध्ये बांधले जाणारे हे धरण अनेक कारणांसाठी भारताची चिंता वाढवणारे आहे. या धरणामुळे पाणी अडवले जाणार असून, भारताचा चीनबरोबर त्यासंबंधी कोणताही करार झालेला नाही. 
 
- ब्रम्हपुत्र नदीवरील धरणामुळे अरुणाचलप्रदेशवरील आपला दावा अधिक बळकट होईल, असे चीनला वाटते. 
 
- तिबेटमधील धरणामुळे भारतातील नद्यांचा प्रवाह कमी होण्याची चिंता भारताला वाटते. 
 
- युद्ध किंवा आणीबाणीच्या प्रसंगी चीन धरण, कालवे आणि सिंचन प्रकल्पाचा अस्त्रासारखा वापर करु शकतो. 
 
- तिबेटवरील धरणा प्रकल्पांमुळे भारताच्या ईशान्येकडील राज्ये आसाम, मणिपूर, अरुणाचलप्रदेश या भागांना धोका आहे. इथे पूराचे प्रमाण वाढू शकते किंवा पाण्याचा प्रवाह कमी होऊ शकतो. 
 

Web Title: Five dangers of 'this' to India from Tibetan dam in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.