या चिमण्यांनो परत फिरा रे...भारताचा 'नेस्ट मॅन' ज्यानं चिमण्यांसाठी बनवलीत २,५०,००० घरटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 06:54 PM2023-04-07T18:54:26+5:302023-04-07T18:56:06+5:30

राकेश खत्री यांना 'नेस्ट मॅन ऑफ इंडिया' असं म्हटलं जातं. त्यांनी देशभरात पक्ष्यांसाठी २,५०,००० घरटी बनवली आहेत.

india nest man inspiring story who made 250000 nests for birds trains tricks to students | या चिमण्यांनो परत फिरा रे...भारताचा 'नेस्ट मॅन' ज्यानं चिमण्यांसाठी बनवलीत २,५०,००० घरटी!

या चिमण्यांनो परत फिरा रे...भारताचा 'नेस्ट मॅन' ज्यानं चिमण्यांसाठी बनवलीत २,५०,००० घरटी!

googlenewsNext

नवी दिल्ली-

राकेश खत्री यांना 'नेस्ट मॅन ऑफ इंडिया' असं म्हटलं जातं. त्यांनी देशभरात पक्ष्यांसाठी २,५०,००० घरटी बनवली आहेत. ते म्हणतात की निसर्गाला आपली गरज नाही, आपल्याला निसर्गाची गरज आहे. यामध्ये कोणताही असमतोल सर्वांसाठी धोक्याचा ठरेल. हाच विचार करून त्यांनी पक्ष्यांची घरटी बनवण्याची मोहीम सुरू केली आहे. सुरुवातीला लोक त्यांच्यावर हसायचे. पण, राकेश खत्री यांनी त्याची पर्वा केली नाही. त्यांना पक्ष्यांचा किलबिलाट आवडतो. पक्षी जिथे जिथे धान्य टिपताना दिसतात तिथं ते घरटी बनवू लागतात. येणाऱ्या पिढीला देखील ते याच्याशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. शाळकरी मुलांना पक्ष्यांची घरटी बनवण्याचं प्रशिक्षण देण्यासाठी ते देशभरात फिरतात.

राकेश खत्री यांचे बालपण दिल्लीतील चांदनी चौकात गेलं. त्यांच्या घराच्या गच्चीवर बरीच घरटी होती. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे पक्षी पिसांच्या आत घरटी बनवायचे. १९८० मध्ये ते अशोक नगर येथे स्थलांतरित झाले. झपाट्यानं नागरीकरण होत होतं. जंगलं, फळबागा नाहीशा होत होत्या. पक्ष्यांची घरटी दिसणं बंद झालं होतं. यानं तो अस्वस्थ होत होता. मग त्यांनी पक्ष्यांची घरटी स्वतः बांधायचं ठरवलं.

लोकांनी माझी चेष्टा केली
राकेश यांनी असं ठरवलं तेव्हा लोकांनी त्यांची चेष्टा केली. पक्षी स्वतःची घरटी बनवतात असं ते म्हणायचं. माणसानं बनवलेल्या घरट्यात ते का राहायला येतील? सुरुवातीला त्यांनी नारळापासून घरटी बनवली. अशी ४० घरटी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आली होती. काही दिवसांनी त्यांनी पाहिलं तर त्यात एकही पक्षी नव्हता. यामुळे लोकांनी त्यांची खूप खिल्ली उडवली. मात्र, राकेश थांबले नाहीत. याबाबत त्यांनी अधिक संशोधन केलं. नंतर बांबूच्या काड्यांनी घरटी बनवली. यावेळी त्यांना यश मिळालं.

शाळेतील मुलांना घरटी बनवण्याचं प्रशिक्षण
चिमण्यांची घरटी बनवण्यासाठी नारळाची पोळी, बांबू, कापूस, ताग इत्यादींचा वापर केला जातो. त्यांनी देशभरातील ३,५०० शाळांमध्ये घरटी बनवण्याच्या कार्यशाळा घेतल्या आहेत. त्यांनी एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं आहे. त्यांच्या 'इकोरूट्स फाउंडेशन'च्या माध्यमातून ते पक्षी वाचवण्याच्या कामात गुंतले आहेत.

राकेश खत्रींच्या मतानुसार यापेक्षा मोठं चांगलं कार्य असूच शकत नाही. माणसांनी पक्ष्यांचं घर हिरावून घेतलं आहे. आता स्वतःचं घर बांधण्याची जबाबदारी त्यांची आहे. आपल्याला निसर्गाची गरज आहे. निसर्ग आपला नाही. स्वतःला आनंदी ठेवायचं असेल तर निसर्गाशी एकरूप होऊन काम करावं लागेल. त्याचं कारण म्हणजे निसर्ग हा आपल्या सर्वांचा पालक आहे, असंही ते म्हणतात.

Web Title: india nest man inspiring story who made 250000 nests for birds trains tricks to students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.