४ जूननंतर नितीश कुमार घेऊ शकतात मोठा निर्णय; तेजस्वी यादवांच्या नव्या दाव्यामुळे उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 03:38 PM2024-05-28T15:38:11+5:302024-05-28T15:39:43+5:30

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार असून ४ जून रोजी निकाल समोर येणार आहेत.

lok sabha election 2024 Nitish Kumar may take a big decision after June 4 Tejashwi Yadav's new claim | ४ जूननंतर नितीश कुमार घेऊ शकतात मोठा निर्णय; तेजस्वी यादवांच्या नव्या दाव्यामुळे उडाली खळबळ

४ जूननंतर नितीश कुमार घेऊ शकतात मोठा निर्णय; तेजस्वी यादवांच्या नव्या दाव्यामुळे उडाली खळबळ

Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार असून ४ जून रोजी निकाल समोर येणार आहेत. एनडीए आणि इंडिया आघाडीच्या प्रचारसभा सुरू आहेत. दरम्यान, राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. 

"सीएम नितीश ४ जूननंतर कोणताही मोठा निर्णय घेऊ शकतात. नितीशकुमार आपला पक्ष वाचवण्यासाठी कोणतेही पाऊल उचलू शकतात, असं वक्तव्य तेजस्वी यादव यांनी केले. या वक्तव्यानंतर बिहारमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. त्यांच्या या दाव्यामुळे बिहारमध्ये सत्ताबदलाच्या अफवाही वाढल्या आहेत, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अनेकदा सांगितले आहे की ते भाजप सोडून कुठेही जात नाहीत.

भाजपला कोणत्या राज्यात मिळणार सर्वात मोठं यश? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, केली मोठी 'भविष्यवाणी'!

बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी मंगळवारी पाटण्यात माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला. पत्रकारांनी तेजस्वी यादव यांना विचारले की नितीश कुमार सोबत येणार का? त्यावर त्यांनी ४ जूनपर्यंत थांबा, असे उत्तर दिले. 

दुसरीकडे, इंडिया आघाडीचे शिल्पकार असलेले नितीश कुमार भाजपासोबत गेल्यानंतरही तेजस्वी यादव यांनी त्यांच्यासाठी आरजेडीचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. तेजस्वी यांदव अनेकदा बोलताना सांगतात की, त्यांचे काका नितीश कुमार हे पालकासारखे आहेत. याआधीही त्यांचा आदर केला आणि भविष्यातही करत राहतील. 

मोदींची मोठी भविष्यवाणी

मोदी म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये सातत्याने हत्या होत आहेत. हल्ले होत आहेत. मतदानापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकले जात आहे. एवढे अत्याचार होऊनही लोक अधिकाधिक मतदान करत आहेत. टीएमसी बंगालच्या निवडणुकीत अस्तित्वाची लढाई लढत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आमचे तीन लोक होते आणि बंगालच्या लोकांनी आम्हाला 80 वर नेले. गेल्या वेळीही लोकसभा निवडणुकीत आपल्याला प्रचंड बहुमत मिळाले होते. यावेळी पश्चिम बंगालमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळेल."

पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत येथे भाजपला 18 जागा मिळाल्या होत्या. तर टीएमसीला 22 आणि काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. महत्वाचे म्हणजे, त्यावेळी डाव्यांचा पार सुपडा-साफ झाला होता. गेल्या निवडणुकीतील सर्वोत्तम कामगिरीसंदर्भात बोलायचे झाल्यास, उत्तर प्रदेशत भाजपला मोठा फायदा झाला होता. येथे भाजपने एकूण 80 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या. याशिवाय, भाजपचा मित्रपक्ष अपना दलने दोन जागा जिंकल्या होत्या, बसपाला 10, सपाला पाच तर काँग्रेसला एक जागा मिळाली होती.

Web Title: lok sabha election 2024 Nitish Kumar may take a big decision after June 4 Tejashwi Yadav's new claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.