प्रेयसीचं दुसऱ्यासोबत लग्न होताना पाहून प्रियकर सैरभैर झाला, स्टेजवर आला अन्...; नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 11:32 AM2022-07-07T11:32:49+5:302022-07-07T11:33:40+5:30

प्रेयसीचं लग्न होताना पाहून प्रियकर वेडा झाला, संतापला आणि त्याने स्टेजवर चढून सर्वांसमोर नवरीच्या गळ्यात हार घातला.

lover reached girlfriends wedding in nalanda family thrashed fiercely | प्रेयसीचं दुसऱ्यासोबत लग्न होताना पाहून प्रियकर सैरभैर झाला, स्टेजवर आला अन्...; नेमकं काय घडलं? 

प्रेयसीचं दुसऱ्यासोबत लग्न होताना पाहून प्रियकर सैरभैर झाला, स्टेजवर आला अन्...; नेमकं काय घडलं? 

googlenewsNext

नवी दिल्ली - बिहारमधील नालंदा जिल्ह्यात एका विवाह सोहळ्यादरम्यान विचित्र घटना समोर आली आहे. यात प्रेयसीचं लग्न होताना पाहून प्रियकर वेडा झाला, संतापला आणि त्याने स्टेजवर चढून सर्वांसमोर नवरीच्या गळ्यात हार घातला. तरुणाने वधूला कुंकूही लावण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार पाहून स्टेजवर उपस्थित असलेला नवरदेवही हैराण झाला. समारंभात उपस्थित असलेले लोकही आश्चर्यचकित झाले. वधूच्या कुटुंबीयांनी तरुणाला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर वराने लग्नास नकार दिला. नवरदेवाच्या या निर्णयामुळे नवरीकडील लोक आणखीच नाराज झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, हरनौत पोलीस स्टेशन हद्दीतील मुबारकपूर गावात ही घटना घडली आहे. मुबारकपूर गावातील रहिवासी असलेल्या मुकेशचे गेल्या एका वर्षापासून गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. ही बाब मुलीच्या घरच्यांना समजताच त्यांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं. मंगळवारी रात्री मुलीची वरात आली होती. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक हार घालण्याच्या कार्यक्रमावेळी प्रियकर मुकेश हातात फुलांचा हार आणि सिंदूर घेऊन स्टेजवर चढला आणि नववधूच्या गळ्यात त्याने हा हार घातला. यानंतर तिथे उपस्थित लोकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली.

नवरदेव या घटनेनंतर लग्न न करताच वरात घेऊन परत गेला. वरात परतल्याने वधूपक्षाचे लोक आणखीच भडकले आणि त्यांनी प्रियकराला बेदम मारहाण केली. सध्या त्याला बिहारशरीफ येथील एका रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. प्रियकर मुकेशने सांगितलं की, त्याचं गावातीलच एका मुलीशी प्रेमसंबंध होते. दोघांनी एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याचं ठरवलेलं असा दावा त्याने केला आहे. असं असतानाही मुलीच्या कुटुंबीयांनी त्याच्या प्रेयसीचं बळजबरीने दुसऱ्याशी लग्न लावून दिलं.

मुकेशने दिलेल्या माहितीनुसार, प्रेयसीने त्याला सांगितलं होतं की, जेव्हा तिचं लग्न होणार असेल तेव्हा त्याने हार घालण्याच्या वेळी येऊन तिला कुंकू लावावं, त्यानंतर मी तसंच केलं. या संपूर्ण घटनेनंतर नवरदेवाने मुलीशी लग्न करण्यास नकार दिला आणि लग्न न करताच परतला. यानंतर प्रियकर खोटे दावे करत असल्याचं वधूच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. तरुणाचे त्यांच्या मुलीसोबत प्रेमसंबंध नव्हते, असंही ते म्हणाले. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: lover reached girlfriends wedding in nalanda family thrashed fiercely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न