Navneet Rana : "हिंदू संस्कृतीवर डाग लागला; 2 तरुणींशी लग्न करणाऱ्यावर कारवाई व्हावी"; नवनीत राणांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 12:22 PM2022-12-15T12:22:40+5:302022-12-15T12:27:24+5:30

Navneet Rana : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी हा मुद्दा उपस्थित केला. तसेच कारवाईची मागणी केली आहे.

Navneet Rana Slams Akluj rinki and pinki wedding with atul awtade | Navneet Rana : "हिंदू संस्कृतीवर डाग लागला; 2 तरुणींशी लग्न करणाऱ्यावर कारवाई व्हावी"; नवनीत राणांची मागणी

Navneet Rana : "हिंदू संस्कृतीवर डाग लागला; 2 तरुणींशी लग्न करणाऱ्यावर कारवाई व्हावी"; नवनीत राणांची मागणी

Next

काही दिवसांपूर्वी जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाशी लग्न केल्याने मोठी चर्चा रंगली होती. सोलापूरच्या अतुल आवताडे या तरुणाने एकाच मांडवात दोन जुळ्या बहिणींसोबत लग्न केलं. या लग्नाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यानंतर एकाचवेळी दोन मुलींशी लग्न केल्याप्रकरणी नवरदेव अतुल अवताडे चांगलाच अडचणीत आला. अकलूज पोलीस ठाण्यात अतुलविरोधात तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हे प्रकरण नेले. मात्र सोलापूर न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या महत्त्वपूर्ण टिप्पणीमुळे अतुलला मोठा दिलासा मिळाला आहे.

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला. तसेच कारवाईची मागणी केली आहे. "सोलापूरच्या अकलूजमध्ये एक घटना घडली त्यामुळे हिंदू संस्कृतीवर डाग लागला. एका तरुणाने एकाच मांडवात दोन तरुणींशी लग्न केलं. कलम 494, 495 हे कायदे देशात आहेत. पण देशात अद्यात एका वेळी दोन मुलींशी लग्न करण्याबाबत कोणताही ठोस कायदा बनवण्यात आलेला नाही. यासाठी काहीतरी नवा कायदा बनवणं गरजेचं आहे. जे असं लग्न करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जेणे करून अशा घटना भविष्यात घडणार नाहीत. यामुळे संस्कृतीला धक्का लागतो आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून यांचे फोटो व्हायरल होत आहेत" असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. 

अतुलविरोधात दाखल झालेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी न्यायालयात तपास करण्याची परवानगी मागितली असता, न्यायालयाने अदखलपात्र गुन्ह्यात तपास करता येत नाही असे आदेश दिले, अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली. न्यायालयात यावर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने पीडित कोण आहे?, असे विचारले. कारण तक्रार करणारा हा पीडित नव्हता. जुळ्या बहिणींपैकी कोणी असेल किंवा संबंधित लग्न करणाऱ्याचे पाहिले लग्न झाले असेल आणि पहिल्या बायकोने तक्रार दिली असेल तर तपास करा, असा आदेश न्यायालयाने दिल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. 

नेमकं प्रकरण काय?

जन्म, बालपण, शिक्षणच काय, तर नोकरीही एकत्रित असा जीवनाचा प्रवास एकत्रित करणाऱ्या रिंकी व पिंकी या जुळ्या बहिणींची ही आयुष्याची गोष्ट. दोघींना एकमेकींची इतकी सवय लागली की, त्या एकमेकींशिवाय राहणे कठीण बनले होते. इतकेच काय, तर एकमेकींची आवड- निवडही एकसारख्याच झाल्या होत्या. कांदिवली येथील रिंकी व पिंकी उच्च विभूषित असून आयटी क्षेत्रात मोठ्या पगारावर नोकरी करणाऱ्या जुळ्या बहिणी. वडिलांच्या पश्चात आईसोबत राहत होत्या. 

सहा महिन्यांपूर्वी रिंकी, पिंकी व आई आजारी पडल्या होत्या. यावेळी अंधेरी येथे राहणाऱ्या अतुल या टॅक्सी ड्रायव्हरने तिघींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिघींच्या कुटुंबात पुरुष नसल्याने माणुसकीच्या नात्याने अतुलने तिघींची रात्रंदिवस सेवा केली. यामुळे तिघींना अतुलविषयी आपुलकी निर्माण झाली. यातूनच जुळ्या बहिणींतील एकीचे प्रेम हे अतुलबरोबर जडले, पण दोघींनी एकमेकींना कधीच सोडले नसल्याने त्या विभक्त होऊन राहू शकत नसल्याने दोघींनी अतुलशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Navneet Rana Slams Akluj rinki and pinki wedding with atul awtade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.