छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून १६ गावक-यांची हत्या

By admin | Published: March 2, 2016 06:40 PM2016-03-02T18:40:45+5:302016-03-02T18:43:27+5:30

छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांनी १६ गावक-यांची हत्या केली. नारायणपूरवर नक्षलवाद्यांचे वर्चस्व आहे.

Naxalites kill 16 villagers in Chhattisgarh | छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून १६ गावक-यांची हत्या

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून १६ गावक-यांची हत्या

Next

ऑनलाइन लोकमत 

नारायणपूर, दि. २ - छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांनी १६ गावक-यांची हत्या केली.  नारायणपूरवर नक्षलवाद्यांचे वर्चस्व आहे. नक्षलवाद्यांच्या कांगारु न्यायालयाने हे गावकरी पोलिसांचे खबरी असल्याचा निकाल दिल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. 
ही घटना २९ फेब्रुवारी रोजी घडली. नक्षलवाद्यांनी बैठकीसाठी गावक-यांना बोलावले होते. त्यावेळी कांगारु कोर्टाच्या सुनावणीत या गावक-यांना पोलिसांचे खबरी असल्याच्या आरोपाखाली दोषी धरण्यात आले. तीन गावक-यांचे मृतदेह आतापर्यंत मिळाले असून, १३ मृतदेह नक्षलवाद्यांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे. 

Web Title: Naxalites kill 16 villagers in Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.