राव सरकारकडून फक्त कुटुंबकल्याण : फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 08:33 AM2023-11-29T08:33:26+5:302023-11-29T08:35:59+5:30

Telangana Assembly Election : तेलंगणातील बीआरएस सरकारने केवळ एका कुटुंबाचे भले केले, प्रचंड भ्रष्टाचारातून घर भरले आणि जनतेला वाऱ्यावर साेडून दिले. तेलंगणाचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी भाजपालाच मतदान करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी केले.

Only family welfare from Rao government: Fadnavis | राव सरकारकडून फक्त कुटुंबकल्याण : फडणवीस

राव सरकारकडून फक्त कुटुंबकल्याण : फडणवीस

वारंगल - तेलंगणातील बीआरएस सरकारने केवळ एका कुटुंबाचे भले केले, प्रचंड भ्रष्टाचारातून घर भरले आणि जनतेला वाऱ्यावर साेडून दिले. तेलंगणाचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी भाजपालाच मतदान करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी केले.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या आज देवरकोंडा, पालाकुर्ती आणि नरसामपेट मतदारसंघात रोड शो आणि प्रचारसभा झाल्या. यावेळी ते म्हणाले की, तेलंगणाने भ्रष्टाचार, दुराचाराची दहा वर्ष अनुभवली आहेत. तेलंगणाचे सरकार केवळ एका कुटुंबासाठी काम करते आहे. 

बीआरएस आणि काँग्रेस हे एकच
एका कुटुंबाला रोजगार मिळाला आणि त्यांचेच केवळ भले झाले. बीआरएस आणि काँग्रेस हे एकच आहेत. ते सोबत येऊन पंतप्रधान 
नरेंद्र मोदी यांना हरवू पाहत आहेत. त्यामुळे आता केवळ भाजपालाच निवडून द्या, असे फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी यावेळी चार राज्यांमध्ये प्रचार केला. 

Web Title: Only family welfare from Rao government: Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.