पुढच्या ५ वर्षांत देशातून पेट्रोल होणार हद्दपार; विहिरीतील पाण्यात 'अविष्कार'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 07:34 AM2022-07-08T07:34:29+5:302022-07-08T07:34:59+5:30

‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी देऊन नितीन गडकरी यांचा सन्मान, इथेनॉलच्या एका निर्णयाने देशातील २० हजार कोटींची बचत झाली. येत्या काळात दुचाकी, चारचाकी गाड्या ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल, सीएनजीवर चालणार आहेत.

Petrol will be deported from the country in next 5 years - Nitin Gadkari | पुढच्या ५ वर्षांत देशातून पेट्रोल होणार हद्दपार; विहिरीतील पाण्यात 'अविष्कार'

पुढच्या ५ वर्षांत देशातून पेट्रोल होणार हद्दपार; विहिरीतील पाण्यात 'अविष्कार'

googlenewsNext

अकोला : आता गाड्यांमध्ये विदर्भात तयार केलेल्या बायो इथेनॉलचा वापर होत आहे. विहिरीतील पाण्याच्या माध्यमातून ग्रीन हायड्रोजन तयार करून ७० रुपये प्रतिकिलो विक्री होऊ शकते. त्याच्या अधिक वापरामुळे भविष्यात कोणी पेट्रोल-डिझेलचा वापर करणार नाही. त्यामुळे पुढच्या पाच वर्षांत देशातून पेट्रोल हद्दपार होईल. आता गहू, तांदूळ, मका लावून कोणी भविष्य बदलू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अन्नदाता नाही, ‘ऊर्जा’दाता बनण्याची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३६ वा दीक्षान्त समारंभ गुरुवारी पार पडला, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी, सन्माननीय अतिथी म्हणून पद्मश्री डॉ. मोतीलाल मदान, कुलगुरू डॉ. विलास भाले, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे उपस्थित होते. कृषी विद्यापीठाकडून गडकरी यांना यावेळी ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित करण्यात आले.

गडकरी म्हणाले, इथेनॉलच्या एका निर्णयाने देशातील २० हजार कोटींची बचत झाली. येत्या काळात दुचाकी, चारचाकी गाड्या ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल, सीएनजीवर चालणार आहेत. विदर्भातील कापूस बांगलादेशात निर्यात करण्याची योजना बनविली असून, याकरिता विद्यापीठांचे सहकार्य आवश्यक आहे. विदर्भातील शेतकऱ्यांची आत्महत्या पूर्णत: थांबविण्यासाठी विद्यापीठ मोठे सहकार्य करू शकते. 

‘विदर्भाचे शेतकरीही माल निर्यात करू शकतात!’ 
मुंबईसारखी भक्कम आर्थिक राजधानी असलेल्या राज्यात शेतकरी आत्महत्या करतात, हा चिंतेचा विषय आहे. त्यासाठी नोकरीच्या मागे न लागता, शेती विकासाला प्राध्यान्य देण्याची आवश्यकता आहे. जळगावातील शेतकरी पिकाची निर्यात करू शकतात. मग, विदर्भातील शेतकरी का करू शकत नाही. निर्यात करणाऱ्या शेती पिकांच्या दिशेने काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

Web Title: Petrol will be deported from the country in next 5 years - Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.