...तेव्हा RSSवाले इंग्रजांचं लांगुलचालन करत होते- प्रियंका गांधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 21:15 IST2019-05-14T21:08:31+5:302019-05-14T21:15:22+5:30
19 मे रोजीच्या सातव्या टप्प्यानंतर मतदान प्रक्रिया संपणार आहे.

...तेव्हा RSSवाले इंग्रजांचं लांगुलचालन करत होते- प्रियंका गांधी
नवी दिल्लीः 19 मे रोजीच्या सातव्या टप्प्यानंतर मतदान प्रक्रिया संपणार आहे. परंतु तत्पूर्वीच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. बठिंडाच्या भूमीवरून मोदींनी केलेल्या टीकेला प्रियंका गांधींनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या, जेव्हा इंग्रजांविरोधात लढाई सुरू होतो. त्यावेळी आरएसएसवाले इंग्रजांचं लांगुलचालन करण्यात व्यक्त होते. तेव्हा आरएसएसच्या लोकांनी तत्कालीन इंग्रजांच्या सरकारचं समर्थन केलं होतं. संघाच्या लोकांनी स्वातंत्र्याच्या लढाईत कधीही सहभाग घेतलेला नव्हता.
प्रियंका गांधींनी पुन्हा एकदा गेल्या पाच वर्षांतील मोदी सरकारच्या कामावरून त्यांना लक्ष्य केलं. मोदी सरकारनं फक्त कागदांवर मोठमोठी आश्वासनं दिली. परंतु जमिनीवर त्यांनी काहीही केलेलं नाही. देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संरक्षण क्षेत्रातही दलाली केली गेली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं गेलेलं नाही. यावेळी प्रियंका गांधींनी पंजाबमधील अकाली दलावरही हल्लाबोल केला. अकाली दलाचं सरकार असताना त्यांनी काय विकास केला हे जनतेला चांगलं माहीत आहे.
Priyanka Gandhi Vadra in Bathinda, Punjab: When the entire Punjab was fighting for country's independence, RSS people were doing 'chamchagiri' (flattery) of Britishers, they never fought in the independence movement. pic.twitter.com/ObeOD0R549
— ANI (@ANI) May 14, 2019
त्यामुळेच जनतेनं त्यांना सत्तेतून पायउतार केल्याचंही प्रियंका गांधी म्हणाल्या. तसेच यंदा जनता देशातूनही मोदी सरकारला बाहेरचा रस्ता दाखवेल, असा विश्वासही प्रियंका गांधींनी व्यक्त केला आहे.