Pulwama Attack: भारतमातेने गमावले काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे वीरपुत्र, महाराष्ट्राचे दोन जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 03:32 PM2019-02-15T15:32:19+5:302019-02-15T15:51:40+5:30

दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 38 जवानांना हौतात्म्य

Pulwama Attack Mother India sacrifices sons from Kashmir to Kanyakumari | Pulwama Attack: भारतमातेने गमावले काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे वीरपुत्र, महाराष्ट्राचे दोन जवान शहीद

Pulwama Attack: भारतमातेने गमावले काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे वीरपुत्र, महाराष्ट्राचे दोन जवान शहीद

Next

नवी दिल्ली: दोन वर्षांपूर्वी उरीमध्ये झालेल्या हल्ल्याची जखम अद्याप भळभळती आहे. भारतीय नागरिक अद्याप हा हल्ला विसरलेले नाहीत. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केला. मात्र त्यानंतर पाकिस्तानकडून होणाऱ्या कुरघोड्या सुरुच राहिल्या. काल काश्मीरमधील पुलवामात झालेल्या हल्ल्यानं पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा जगासमोर आणला. पाकिस्तान माणुसकीची चिंता नाहीच, मात्र तो आंतरराष्ट्रीय नियमांनादेखील जुमानत नाही, हेच कालच्या हल्ल्यानं अधोरेखित केलं. 

उरीत भारताचे 19 जवान शहीद झाले. पुलवामातील हल्ला यापेक्षा भीषण ठरला. यामध्ये सीआरपीएफच्या 38 जवानांना वीरमरण आलं. उरी आणि पुलवामा या दोन हल्ल्यांदरम्यान पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच होतं. याशिवाय दहशतवाद्यांची घुसखोरी आणि त्यांच्याकडून होणारा गोळीबारदेखील थांबला नव्हता. भारतीय सैन्य या दुहेरी आव्हानांचा सामना करत असताना काल पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर मोठा हल्ला झाला. यात भारतभूमीचे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे सुपुत्र गमावले.
 
पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 38 जवानांना वीरमरण आलं. यामध्ये आसाम (1), बिहार (2), हिमाचल प्रदेश (1), जम्मू-काश्मीर (1), झारखंड (1), कर्नाटक (1), केरळ (1), मध्य प्रदेश (1), महाराष्ट्र (2), ओदिशा (2), पंजाब (4), राजस्थान (5), तमिळनाडू (1), उत्तर प्रदेश (12), उत्तराखंड (2), पश्चिम बंगाल (1) या राज्यांमधील शहिदांचा समावेश आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली. 

काल काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटकं असल्यानं बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले. तर अनेक जवान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 
 

Web Title: Pulwama Attack Mother India sacrifices sons from Kashmir to Kanyakumari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.