स्वामी प्रसाद मौर्य यांची जीभ कापणाऱ्याला 51 हजारांचे बक्षीस; हिंदू महासभेच्या नेत्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 10:25 AM2023-01-24T10:25:18+5:302023-01-24T10:28:00+5:30

स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसमधील काही श्लोक कथितपणे भेदभाव करणारे म्हटल्यानंतर एक दिवसानंतर अखिल भारत हिंदू महासभेच्या एका नेत्याने त्यांची जीभ कापून टाकणाऱ्याला 51,000  रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

ramcharitmanas row hindu mahasabha announces 51 thousand reward for cutting off sp leader swami prasad tongue | स्वामी प्रसाद मौर्य यांची जीभ कापणाऱ्याला 51 हजारांचे बक्षीस; हिंदू महासभेच्या नेत्याची घोषणा

स्वामी प्रसाद मौर्य यांची जीभ कापणाऱ्याला 51 हजारांचे बक्षीस; हिंदू महासभेच्या नेत्याची घोषणा

googlenewsNext

बिहारमधून सुरू झालेला रामचरितमानसचा वाद आता उत्तर प्रदेशात पोहोचला आहे. समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसच्या चौपाईला भेदभाव करणारी असल्याचे म्हणत त्यावर बंदी घालण्याची मागणी केलीआहे. यानंतर हिंदू महासभेच्या एका नेत्याने त्यांची जीभ कापणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणा केली. दरम्यान, स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसमधील काही श्लोक कथितपणे भेदभाव करणारे म्हटल्यानंतर एक दिवसानंतर अखिल भारत हिंदू महासभेच्या एका नेत्याने त्यांची जीभ कापून टाकणाऱ्याला 51,000  रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

"जर एखाद्या व्यक्तीने समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांची जीभ कापली तर त्याला बक्षीस म्हणून 51,000 रुपयांचा धनादेश दिला जाईल. त्यांनी आमच्या धार्मिक ग्रंथाचा अपमान केला आहे. याचबरोबर, त्यांनी हिंदूंच्या भावनाही दुखावल्या आहेत", असे महासभेचे आग्रा जिल्हा प्रभारी सौरभ शर्मा म्हणाले. इतकेच नाही तर अखिल भारतीय हिंदू महासभेने सोमवारी आग्रा येथे स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विधानाचा निषेध केला.

दरम्यान, रामचरितमानसबाबत स्वामी प्रसाद मौर्य यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा त्यांच्याच समाजवादी पक्षाच्या आमदारांनी निषेध केला आहे.  या प्रकरणी पक्षप्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती देणार असल्याचे समाजवादी पक्षाच्या आमदारांनी सांगितले.  रामचरितमानस हा असा ग्रंथ आहे, जो जगभर वाचला जातो आणि विचार केला जातो, असे समाजवादी पक्षाचे नेते मनोज पांडे म्हणाले. 

याचबरोबर, समाजवादी पक्षाचे आमदार मनोज पांडे म्हणाले की, हे पुस्तक माणसाला नैतिक मूल्ये आणि परस्पर संबंधांचे महत्त्व सांगते. आम्ही केवळ रामचरितमानसच नाही तर बायबल, कुराण आणि गुरु ग्रंथ साहिब यांचाही तितकाच आदर करतो.  हे ग्रंथ आपल्याला सर्वांसोबत राहायला शिकवतात. तसेच, अखिलेश यादव सध्या उत्तराखंडमध्ये आहेत आणि त्यांना याची जाणीव आहे.

काय म्हणाले होते स्वामी प्रसाद मौर्य?
"रामचरितमानसच्या काही श्लोकांमध्ये जात, वर्ण आणि वर्गाच्या आधारावर समाजातील कोणत्याही घटकाचा अपमान केला गेला असेल तर तो धर्म नसून अधर्म आहे.  यामुळे केवळ भाजपलाच नव्हे, तर साधूसंतांवरही हल्ले करण्यास प्रवृत्त केले जाते.  रामचरितमानसच्या काही ओळींमध्ये तेली, कुम्हार यांसारख्या जातींची नावे सांगितल्यामुळे या जातींच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात", असे स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले होते. दरम्यान, स्वामी प्रसाद मौर्य यांनी पुस्तकाच्या या भागावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

Web Title: ramcharitmanas row hindu mahasabha announces 51 thousand reward for cutting off sp leader swami prasad tongue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.