सात पाकिस्तानी सैनिक ठार, भारताकडून क्षेपणास्त्राचा वापर ?

By admin | Published: November 14, 2016 02:52 PM2016-11-14T14:52:44+5:302016-11-14T15:02:20+5:30

नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याच्या गोळीबारात आमचे सात सैनिक मारले गेले असा दावा पाकिस्तानने केला आहे.

Seven Pakistani soldiers killed, use of missile from India? | सात पाकिस्तानी सैनिक ठार, भारताकडून क्षेपणास्त्राचा वापर ?

सात पाकिस्तानी सैनिक ठार, भारताकडून क्षेपणास्त्राचा वापर ?

Next

ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. १४ - नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याच्या गोळीबारात आमचे सात सैनिक मारले गेले असा दावा पाकिस्तानने केला आहे. भिमबेर सेक्टरमध्ये रात्री झालेल्या गोळीबारात आमचे सात सैनिक ठार झाले असे पाकिस्तानने म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विनाकारण गोळीबार करणा-या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने मोठया प्रमाणावर तोपाचा वापर केला तसेच रणगाडे विरोधी क्षेपणास्त्रही वापरले.
 
 
सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन कुरापती काढणा-या पाकिस्तानला भारतीय सैन्य जशास तसे प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानच्या गोळीबारातही भारताचे काही जवान शहीद झाले. अनेक निष्पाप नागरीक मारले गेले. मागच्या काही दिवसात सीमा सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले पण पाकिस्तानने कधीही जाहीरपणे हे मान्य केले नाही. 
 
तसेच बदनामी टाळण्यासाठी या बातम्या दाबून ठेवल्या पण यावेळी पाकिस्तानने प्रथमच आपले सात सैनिक मारले गेल्याचा दावा केला आहे. मागच्या काही आठवडयात भारताच्या गोळीबारात पाकव्याप्त काश्मिरमधील २५ नागरीक ठार झाल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. 

Web Title: Seven Pakistani soldiers killed, use of missile from India?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.