शहनाज बनली आरोही... कृष्ण भक्तीत तल्लीन झाल्याने नवऱ्याने दिला तलाक; हिंदू मित्राशी केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 10:12 AM2023-06-23T10:12:50+5:302023-06-23T10:21:25+5:30

एक तरुणी भगवान श्रीकृष्णाची भक्त होती म्हणून तिला तिच्या नवऱ्याने ट्रिपल तलाक दिल्याची घटना घडली.

shahnaz became aarohi in bareilly married friend husband gave divorce angry with devotion of shrikrishna | शहनाज बनली आरोही... कृष्ण भक्तीत तल्लीन झाल्याने नवऱ्याने दिला तलाक; हिंदू मित्राशी केलं लग्न

फोटो - आजतक

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक असा प्रकार समोर आला आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एक तरुणी भगवान श्रीकृष्णाची भक्त होती म्हणून तिला तिच्या नवऱ्याने ट्रिपल तलाक दिल्याची घटना घडली. तरुणीने जेव्हा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिला अपशब्द वापरले. कुटुंबीयही तिच्या विरोधात गेले. जेव्हा कोणताही आधार मिळाला नाही तेव्हा मुलीला तिच्या बालपणीच्या एका हिंदू मित्राची आठवण झाली आणि तिने त्याला आपली व्यथा सांगितली. 

हळूहळू दोघांमधील जवळीक वाढू लागली आणि मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि मुलीने इस्लाम धर्म सोडून आता एका हिंदू मित्राशी लग्न केलं आहे. बरेलीच्या फरीदपूर पोलीस ठाण्याच्या ढाकनी राजपुरा गावात राहणारी शहनाज हिचा 2018 मध्ये निकाह झाला होता. ती लहानपणापासूनच भगवान श्रीकृष्णाची भक्त होती आणि त्यांची पूजा करत असे. शहनाजचे कुटुंबीय याला विरोध करत होते आणि म्हणायचे की त्यांच्या धर्मात पूजा केली जात नाही.

शहनाजने कोणाचेही ऐकले नाही आणि लग्नानंतरही ती भगवान श्रीकृष्णाची भक्त राहिली. दुसरीकडे ही बाब सासरच्या घरात कळताच एकच गोंधळ उडाला. पती आणि सासरच्यांनी तिला पूजा करताना पाहिल्यानंतर एकच गोंधळ उडाला. हे पाहून पतीने तिला ट्रिपल तलाक दिला. मुलीने जेव्हा तिचा बालपणीचा मित्र पवन कुमार याला तिची व्यथा सांगितली तेव्हा त्याने तिला साथ दिली. या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघेही बरेलीला पोहोचले आणि अगस्त आश्रमात गेले आणि हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले.

पती आणि घरच्यांच्या अत्याचारामुळे शहनाज खूप अस्वस्थ होती. कुटुंबातील एकही सदस्य मदत करायला तयार नव्हता. याच दरम्यान त्यांना एक व्यक्ती भेटली. अगस्त आश्रमाबद्दल सांगितले. ही माहिती मिळताच दोघांना आशेचा किरण दिसला आणि क्षणाचाही विलंब न लावता दोघेही आश्रमात पोहोचले आणि त्यांनी आपला मुद्दा महंतांना सांगितला. लग्न झाल्यानंतर आता शहनाजने आता तिचे नावही बदलले आहे. शहनाजने सांगितले की, आता तिला आरोही या नावाने हाक मारावी. तरुणीने पोलीस प्रशासनाला पत्र लिहून सुरक्षेची विनंती केली आहे. कुटुंबाकडून जीवाला धोका असल्याचे मुलीचे म्हणणे आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: shahnaz became aarohi in bareilly married friend husband gave divorce angry with devotion of shrikrishna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न