केंद्रापाठोपाठ राज्यातही 14 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी

By admin | Published: November 11, 2016 06:36 PM2016-11-11T18:36:12+5:302016-11-11T19:50:42+5:30

देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील तसेच महाराष्ट्रातील सर्व राज्यमार्गांवरील टोल 14 नोव्हेंबरपर्यंत माफ

Tollmafi till November 14 in the state after the Center | केंद्रापाठोपाठ राज्यातही 14 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी

केंद्रापाठोपाठ राज्यातही 14 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील तसेच महाराष्ट्रातील सर्व राज्यमार्गांवरील टोल14 नोव्हेंबरपर्यंत माफ करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर आज याबाबत घोषणा केली. 500-1000 रूपयांच्या बंदीमुळे नागरिकांची सुट्टे पैसे देताना चांगलीच तारांबळ उडत आहे त्यापार्श्वभुमीवर टोलमाफी वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे वाहतूक सुरळीत राहील ,असे गडकरी यांनी ट्विटरवरून जाहीर केले.   
 
14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही टोलमाफी असणार आहे. यापुर्वी 11 नोव्हेंबपर्यंत टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही मुदत आज मध्यरात्री संपणार होती.  
 
 

Web Title: Tollmafi till November 14 in the state after the Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.