आता टोलमाफी 24 नोव्हेंबरपर्यंत..!

By admin | Published: November 17, 2016 06:10 PM2016-11-17T18:10:05+5:302016-11-17T19:18:23+5:30

राष्ट्रीय महामार्गांवरील टोलमाफी 24 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांना आणखी काही दिवस दिलासा मिळाला आहे.

Tollmaphi till November 24 ..! | आता टोलमाफी 24 नोव्हेंबरपर्यंत..!

आता टोलमाफी 24 नोव्हेंबरपर्यंत..!

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - राष्ट्रीय महामार्गांवरील टोलमाफी 24 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांना आणखी काही दिवस दिलासा मिळाला आहे. 
चलनातून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर देशभरातील नागरिकांची एकच तारांबळ उडताना दिसत आहे. तसेच, टोलनाक्यांवर सुट्टे पैसे उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गांवर 18 नोव्हेंबरपर्यंत टोलवसुली बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. आता यामध्ये वाढ करण्यात आली असून येत्या 24 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता येत्या 24 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही टोलवसुवली बंद राहणार आहे. याबाबत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केलं आहे.  यानंतर राज्य सरकारनेही महामार्गांवरील टोलनाक्यांवर 24 नोव्हेंबरपर्यंत टोल वसुली बंद केली आहे.  
 
 

Web Title: Tollmaphi till November 24 ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.