बिहारमध्ये केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला; सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वाचवलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 05:25 PM2024-08-31T17:25:16+5:302024-08-31T17:25:16+5:30

जनता दरबार संपल्यानंतर तिथून निघत असताना गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला झाला.

Union Minister Giriraj Singh was attacked at Begusarai in Bihar | बिहारमध्ये केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला; सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वाचवलं, म्हणाले...

बिहारमध्ये केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला; सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वाचवलं, म्हणाले...

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह बिहारमधील बेगूसराय येथे त्यांच्या मतदारसंघात आले असता त्यांच्यावर एका युवकाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात केंद्रीय मंत्री सहभागी झाले होते. जनता दरबारातून बाहेर पडत असताना एका तरुणाने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यांना वाचवले. पोलीस हल्लेखोराला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करत आहेत. हल्ला होताच गिरीराज सिंह म्हणाले की, तेजस्वी यादव आणि अखिलेश यादव दाढी असलेल्यांच्या बाजूने उभे राहतील, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

जनता दरबार संपल्यानंतर स्थानिक नगरसेवक आणि आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता शाहजादुज्जमा उर्फ ​​सैफी याने काही प्रश्न विचारले होते. मग तिथून निघताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यानंतर सैफीने घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी घोषणाबाजी करण्यास नकार दिल्याने त्यांनी गिरीराज सिंह यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती दैनिक भास्करने दिली आहे. 

गिरिराज सिंह पुढे म्हणाले की, माझ्यावर हल्ला करणारा दाढीवाला असल्याने आता तेजस्वी यादवही त्याच्या बाजूने उभे राहतील हे दुर्दैवी आहे. अखिलेश यादवही त्यांच्या मतांसाठी हल्लेखोराच्याच बाजूने उभे राहणार आहेत. पण, आम्ही अशा गोष्टींना घाबरत नाही. जो कोणी जातीय सलोखा बिघडवू इच्छित असेल त्याविरोधात माझा आवाज उठवत राहील.

गिरिराज सिंह अशा लोकांना घाबरत नाहीत. वक्फ बोर्ड जमीन बळकावण्याची मोहीम राबवत आहे. त्यांना जी काही जमीन ताब्यात घ्यायची असते ती घेतली जाते. बेगूसरायसह संपूर्ण देशात हा प्रकार सुरू आहे. हिंदूंनी देशात कधीही दंगल केली नाही. पण रामनवमीपासून ते हिंदूंच्या अशा सर्वच धार्मिक यात्रेपर्यंत हल्ले होत असतात. राहुल गांधी, तेजस्वी आणि अखिलेश यादव हे मतांचे व्यापारी आहेत आणि अशा हल्लेखोरांना वाचवण्यासाठी ते नेहमीच पुढे येतात, असेही गिरिराज सिंह यांनी नमूद केले. 

Web Title: Union Minister Giriraj Singh was attacked at Begusarai in Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.