वहिनींना केव्हा सोबत आणणार?

By admin | Published: August 20, 2015 11:20 PM2015-08-20T23:20:15+5:302015-08-21T00:12:46+5:30

आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठीवासीयांनी अनपेक्षित असा प्रश्न विचारून चांगलेच अडचणीत टाकले

When will the bridegroom bring together? | वहिनींना केव्हा सोबत आणणार?

वहिनींना केव्हा सोबत आणणार?

Next

अमेठी : आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठीवासीयांनी अनपेक्षित असा प्रश्न विचारून चांगलेच अडचणीत टाकले. या प्रश्नाने काही क्षण तेही बुचकळ्यात पडले.
त्याचे झाले असे की, राहुल गांधी यांचा ताफा विश्रामगृहातून निघून ग्वाल चौकात पोहोचताच लोकांनी त्यांना रोखले आणि सगळ्यांनी एकाच स्वरात, ‘भय्या, कब तक अकेले आएंगे, भाभी कब साथ आएंगी?’ असा सवाल केला. यावर राहुल यांनी स्मितहास्य केले; परंतु कुठलेही उत्तर न देता पुढे निघून गेले.
राहुल गांधी यांच्या हस्ते बुधवारी येथे विनोबांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. व्यासपीठावरून उतरून ते लहान मुलांकडे गेले आणि माझे नाव काय? अशी विचारणा त्यांना केली. सर्वांनी राहुल गांधी असे सांगताच ते हसले. (वृत्तसंस्था)

Web Title: When will the bridegroom bring together?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.