भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे आव्हान

By admin | Published: June 15, 2017 06:26 PM2017-06-15T18:26:16+5:302017-06-15T21:22:26+5:30

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज सुरू असलेल्या दुसऱ्या उपांत्य लढतीत बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे आव्हान ठेवले.

Chasing 265 for India, | भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे आव्हान

भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे आव्हान

Next

 ऑनलाइन लोकमत

बर्मिंगहॅम, दि. 15 - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज सुरू असलेल्या दुसऱ्या उपांत्य लढतीत बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे आव्हान ठेवले. दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर तमीम इक्बाल आणि मुशफिकूर रहिमने 123 धावांच्या केलेल्या भागीदारीमुळे बांगलादेशने मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र कर्णधार विराट कोहलीने गोलंदाजीमध्ये चातुर्याने केलेले बदल आणि मोक्याच्या क्षणी गोलंदाजांनी केलेला टिच्चून मारा याच्या जोरावर भारताने बांगलादेशला 7 बाद 264 धावांवरच रोखले.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणाऱ्या भारताच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न बांगलादेशी फलंदाजांनी केला. दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर तमीम इक्बाल (70) आणि मुशफिकूर रहिम (61) यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या 123 धावांच्या भागीदारीच्या जोरावर बांगलादेशने 2 बाद 150 अशी मजल मारली होती. 
 
पण ही जोडी धोकादायक ठरतेय असे वाटत असतानाच विराटने केदार जाधवच्या हाती चेंडू दिला. मग केदारने तमीम आणि मुशफिकूरची विकेट काढत भारताला सामन्यात कमबॅक करून दिले. शाकिब अल हसन (15) आणि महमदुल्ला (21) हेही झटपट बाद झाल्याने बांगलादेशच्या डावाला ब्रेक लागला. अखेर निर्धारित 50 षटकात त्यांना 7 बाद 264 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून केदार जाधव, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वरने प्रत्येकी दोन तर, रवींद्र जडेजाने एक गडी बाद केला.

Web Title: Chasing 265 for India,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.