खेळ म्हटलं की जिंकणं आलं, हरणं आलं - विराट कोहली

By Admin | Published: April 2, 2016 01:48 PM2016-04-02T13:48:15+5:302016-04-02T13:48:15+5:30

भारताला उपांत्य फेरीपर्यंत पोचवणारा विराट कोहली विंडिजविरुद्धच्या पराभवातून सावरला आहे.

The game said that the win came, the defeat came - Virat Kohli | खेळ म्हटलं की जिंकणं आलं, हरणं आलं - विराट कोहली

खेळ म्हटलं की जिंकणं आलं, हरणं आलं - विराट कोहली

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - भारताला उपांत्य फेरीपर्यंत पोचवणारा विराट कोहली विंडिजविरुद्धच्या पराभवातून सावरला आहे. इन्स्टाग्रामवर विराटने टीमचा फोटो पोस्ट केला असून सोबत, आम्ही काहीवेळा जिंकणार, काही वेळा हरणार, परंतु आठवणी आपल्याला पुढे घेऊन जात असतात असे मत मांडले आहे. 
झालेल्या चुकांमधून शिकणं आणि प्रत्येक दिवशी सुधारण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं असं सांगत विराटने सकारात्मक संदेश दिला आहे. प्रत्येक सामन्यामध्ये चाहत्यांनी जो प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल वनिराटने सगळ्यांचे आभार मानले आहेत. 
जो आनंद, जल्लोष आणि ऊर्जा बघायला मिळाली त्यामुळे आम्ही जास्त सक्षम आणि चांगले होऊन बाहेर येऊ असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.
 

Web Title: The game said that the win came, the defeat came - Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.