पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला, भारत २ बाद ५०

By admin | Published: August 28, 2015 10:27 AM2015-08-28T10:27:23+5:302015-08-28T12:27:09+5:30

भारत वि. श्रीलंका तिस-या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला असून भारताने १५ षटकांत २ गडी गमावून ५० धावा केल्या.

The game stopped due to rain interruption, India was down 50 | पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला, भारत २ बाद ५०

पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला, भारत २ बाद ५०

Next

ऑनलाइन लोकमत

कोलंबो, दि, २८ -  भारत वि. श्रीलंका तिस-या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला असून भारताने १५ षटकांत २ गडी गमावून ५० धावा केल्या आहेत. 
तिस-या कसोटीत विजय मिळवून मालिका जिंकण्याच्या इराद्याने फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघातील के. एल. राहुल (२) व अजिंक्य रहाणे (८) स्वस्तात बाद झाल्याने भारताला सुरूवातीलाच दोन धक्के बसले. त्यानंतर कर्णधार विराट कोहली (१४) व पुजारा (१९) खेळत असतानाचा पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला.  श्रीलंकेतर्फे प्रसाद व प्रदीपने प्रत्येकी १ बळी टिपला. 

Web Title: The game stopped due to rain interruption, India was down 50

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.